कोकण रेल्वेचा प्रवाशांना दिलासा 

पावसाळी वेळापत्रकात १५ दिवसांची घट


मुंबई (प्रतिनिधी) : भर पावसाळ्यात वीर ते उडुपी या कोकण रेल्वे मार्गाच्या ६४६ किमी मार्गावर वेगमर्यादा लागू असते. त्यामुळे पावसाळ्यात रेल्वेगाड्या सावकाश चालवाव्या लागतात दरवर्षी कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक हे १० जून ते ३१ ऑक्टोबर रोजीपर्यंत असते. मात्र, यावर्षी कोकण रेल्वेने पूर्व पावसाळी कामे नियोजन बद्धरीत्या पूर्ण केल्याने आपल्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे.


१० जूनऐवजी १५ जूनपासून पावसाळी वेळापत्रक लागू होणार असून हे वेळापत्रक ३१ ऑक्टोबर ऐवजी २० ऑक्टोबरपर्यंतब लागू राहील. त्यामुळे पावसाळी वेळापत्रकात १५ दिवस कमी केल्याने, प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. कोकण रेल्वे यावर्षी पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याची माहितीही कोकण रेल्वेचे सीएमडी संतोष कुमार झा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.


ते पुढे म्हणाले की, ७४० किमी लांबीच्या कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांवर पाऊस, पाणी साचणे इत्यादी समस्या टाळण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. या रेल्वे रुळांभोवती पाणी साचल्याने गाड्यांच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही.


प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करणार


ते पुढे म्हणाले की, संवेदनशील ठिकाणी योवीस पास गस्य घालण्यासाठी ६३६ प्रशिक्षित कर्मचारी तैनात केले जात आहेत. आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्यासाठी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि वेर्णा येथे बीआरएन (वॅगन्स) बसवलेल्या उत्खनन यंत्रे बसवण्यात आली आहेत, रेल्वे देखभाल वाहने वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वेर्णा, कारवार, भटकळ आणि उडुपी. ९ प्रमुख ठिकाणी तैनात केली गेली आहेत. तत्काळ कारवाईसाठी माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमाळी, कारवार आणि उडुपी येथे टॉवर वॅगन्स तयार ठेवण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे कमी दृश्यमानतेदरम्यान ट्रेनया वेग ४० किमी/ताशी कमी करण्याच्या सूचना लोको पायलटना देण्यात आल्या आहेत. १५ मिनिटांत वाहतूक सुरू करण्यासाठी तयार असलेली अपघात निवारण ट्रेन (एआरटी) वेरना येथे तैनात केली गेली आहे. जर पाण्याचा वेग १०० मिमीपेक्षा जास्त असेल, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित केली जाईल आणि पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच रेल्वे सुरू केली जाईल.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य