५ लाख नागरिक ‘ई-केवायसीविना’!

३० जूनपर्यंत मिळाली पुन्हा मुदतवाढ


पालघर:वारंवार मुदतवाढ देऊनही शिधापत्रिकांमध्ये नावे असणाऱ्या जिल्ह्यातील ५ लाख ५१ हजार ४१८ नागरिकांनी 'ई- केवायसी' केलेली नाही. रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी करण्यासाठी शासनाने आणखी एकदा ३० जूनपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे. पालघर जिल्ह्यातील ४ लाख ३२ हजार ४९ शिधापत्रिकाधारकांना अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून धान्याचे वाटप केल्या जाते. जिल्ह्यात प्राधान्य योजनेचे ३ लाख ३४ हजार ९० शिधापत्रिकाधारक असून अंत्योदय योजनेचे ९७ हजार ९५९ शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत. दरम्यान, अन्नधान्य वितरित करण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

रेशन कार्ड मध्ये नाव असलेल्या सर्वच नागरिकांना राशन दुकानातील पॉस मशीनवर अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी करण्यासाठी यापूर्वी २८ फेब्रुवारी ची 'डेडलाईन' देण्यात आली होती. या कालावधीत हजारो नागरिकांनी ई-केवायसी केली नसल्याने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ देऊन या मुदतीत ई-केवायसी न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचा धान्य पुरवठा बंद करण्याचे आदेश शासनाने दिले होते. दरम्यान पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील एक लाखाहून अधिक शिधापत्रिकांमध्ये नावे असणाऱ्या साडेपाच लाख शिधापत्रिकाधारकांनी ३० एप्रिल च्या मुदतीपर्यंत ई-केवायसी केलेली नाही.


एप्रिल महिन्यानंतर ई केवायसी करण्याकडे पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. मे अखेरपर्यंत साडेपाच लाखाहून अधिक नागरिकांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे शासनाने ३० जून पर्यंत ई-केवायसी करण्यासाठी मुदत वाढ दिली असून त्यानंतरही ई - केवायसी न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचा धान्य पुरवठा बंद केल्या जाणार आहे.

Comments
Add Comment

Ravi Pandit Passes Away : पुण्यातील नामांकित उद्योजक रवी पंडित यांचे निधन; आयटी क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्व हरपले...

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि KPIT Technologies चे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांचे आज (८ मे) पुण्यात निधन झाले. कंपनीने

Chief Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केपीआयटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली

देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या पहिल्या फळीतील मार्गदर्शक उद्योजक हरपला मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या

Yuzi Chahal : युजवेंद्र चहलने वापरली ई - सिगरेट ; विमानातला 'तो' व्हिडिओ होतोयं व्हायरल...

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. हंगाम संपायला आता काही सामने बाकी आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून रोज

कौतुकास्पद ! पेपर विक्रेत्याच्या मुलीने मिळविले शंभर टक्के, शिकवणी न लावता श्रावणीने गाठले यशाचे शिखर

नाशिक :  मनात जिद्द असेल तर आयुष्यातील कठोर प्रसंगांवरही मात करता येते. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. आर्थिक

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

मिरा भाईंदरमधील २५४ एकर जमिनीसाठी; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

मुंबई : मिरा भाईंदर येथील मिठागराची तब्बल २५४ एकर मोक्याची शासकीय जमीन एका खासगी कंपनीच्या घशात जाण्याची