५ लाख नागरिक ‘ई-केवायसीविना’!

  61

३० जूनपर्यंत मिळाली पुन्हा मुदतवाढ


पालघर:वारंवार मुदतवाढ देऊनही शिधापत्रिकांमध्ये नावे असणाऱ्या जिल्ह्यातील ५ लाख ५१ हजार ४१८ नागरिकांनी 'ई- केवायसी' केलेली नाही. रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी करण्यासाठी शासनाने आणखी एकदा ३० जूनपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे. पालघर जिल्ह्यातील ४ लाख ३२ हजार ४९ शिधापत्रिकाधारकांना अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून धान्याचे वाटप केल्या जाते. जिल्ह्यात प्राधान्य योजनेचे ३ लाख ३४ हजार ९० शिधापत्रिकाधारक असून अंत्योदय योजनेचे ९७ हजार ९५९ शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत. दरम्यान, अन्नधान्य वितरित करण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

रेशन कार्ड मध्ये नाव असलेल्या सर्वच नागरिकांना राशन दुकानातील पॉस मशीनवर अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी करण्यासाठी यापूर्वी २८ फेब्रुवारी ची 'डेडलाईन' देण्यात आली होती. या कालावधीत हजारो नागरिकांनी ई-केवायसी केली नसल्याने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ देऊन या मुदतीत ई-केवायसी न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचा धान्य पुरवठा बंद करण्याचे आदेश शासनाने दिले होते. दरम्यान पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील एक लाखाहून अधिक शिधापत्रिकांमध्ये नावे असणाऱ्या साडेपाच लाख शिधापत्रिकाधारकांनी ३० एप्रिल च्या मुदतीपर्यंत ई-केवायसी केलेली नाही.


एप्रिल महिन्यानंतर ई केवायसी करण्याकडे पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. मे अखेरपर्यंत साडेपाच लाखाहून अधिक नागरिकांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे शासनाने ३० जून पर्यंत ई-केवायसी करण्यासाठी मुदत वाढ दिली असून त्यानंतरही ई - केवायसी न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचा धान्य पुरवठा बंद केल्या जाणार आहे.

Comments
Add Comment

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास, विद्यार्थी हितासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती - मुख्यमंत्री

पावसाळी अधिवेशनात १२ विधेयके लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६०० कोटी मंजूर मुंबई : राज्यात सर्व

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिकांचा रंग हवा पांढरा

अन्य रंगांच्या पत्रिका असल्यास त्वरीत बदलाव्या लागणार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यरत कर्मचारी

कुठल्या तोंडाने आंदोलन करता, शासनाचे दोन्ही जीआर रद्द; फडणवीसांची घोषणा

मुंबई : राज्यात हिंदी भाषेला विरुध्द करण्यासाठी राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर

मनोज जरांगेंची २९ ऑगस्टला 'चलो मुंबई'ची हाक

मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळण्याचा निर्धार जालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या

दोन लाखांच्या बनावट नोटासह तिघे जेरबंद ; राहुरी पोलिसांची कारवाई

राहुरी : राहुरी पोलिसांच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री शहराच्या हद्दीत मोठी कारवाई करत दोन लाख रुपयांच्या २०० व

आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी