Chenab Bridge : १३०० मीटर लांब, ४६७ मीटर ऊंच...पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी ( ६ जून) जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरला रेल्वेने जोडण्याकरिता बांधण्यात आलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, चिनाब पुलाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच श्रीनगर ते जम्मूमधील कटरा यांना जोडणाऱ्या दोन खास डिझाइन केलेल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील, अशी घोषणा केंद्रीय अंतराळ मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केली. हा पूल जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक भाग आहे.


केंद्रीय अंतराळ मंत्री डॉ. सिंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी शेअर केली आणि म्हटले की, "इतिहास घडत आहे... फक्त ३ दिवस बाकी आहेत! जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, शक्तिशाली चिनाब पूल, जम्मू आणि काश्मीरमध्ये उंच उभा आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) चा एक भाग. निसर्गाच्या कठीण परीक्षांना तोंड देण्यासाठी बांधलेला. पंतप्रधान मोदी ६ जून २०२५ रोजी चेनाब पुलाचे उद्घाटन करणार आहेत. नवीन भारताच्या ताकदीचे आणि दृष्टिकोनाचे अभिमानास्पद प्रतीक!"



या रेल्वे लिंकचे उद्घाटन सुरुवातीला १९ एप्रिल २०२५ रोजी होणार होते, परंतु हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टीसह प्रतिकूल हवामान यामुळे ते पुढे ढकलण्यात आले. ६ जून रोजी होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या अनुरूप हे वेळापत्रक बदलण्यात आले आहे, कारण रेल्वे लिंकमुळे यात्रेकरूंचा प्रवास सुलभ होईल.



पुलांवर उच्च तंत्रज्ञानाचे कॅमेरे


दरम्यान, पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी सुरक्षा व्यवस्था लक्षणीयरीत्या वाढवण्यात आली आहे. कटरा-संगलदन विभाग आणि संपूर्ण यूएसबीआरएल ट्रॅकवर बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. विशेषतः कटरा, उधमपूर, रियासी आणि रामबन जिल्ह्यांमध्ये कसून तपासणी, सामानाची तपासणी आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहेत. संभाव्य धोक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅकवर, विशेषतः बोगदे आणि पुलांवर उच्च तंत्रज्ञानाचे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या नवीन सुरक्षा ऑडिटनंतर हे उपाय करण्यात आले आहेत.



२ नवीन वंदे भारत एक्सप्रेस 


मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी ६ जून रोजी रियासी जिल्ह्यातील चिनाब पुलावर पाहणीसाठी जाण्यापूर्वी उधमपूर येथे उतरण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा स्थानकावर पोहोचतील आणि दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील - एक कटरा ते बारामुल्ला आणि दुसरी बारामुल्ला ते कटरा अशी व्हर्च्युअल पद्धतीने. या कार्यक्रमाला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Comments
Add Comment

मोदींचा विरोधकांवर थेट हल्लाबोल, येत्या काळात काँग्रेसमध्ये पडू शकते फुट?

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर दणदणीत विजय मिळला. तर बिहारमधील २४३ जागांपैकी

तेजस्वी यादव विजयी, तर तेजप्रताप पराभूत

पटना : बिहार निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एनडीए २४३ पैकी २०२ जागांसह विक्रमी विजयाकडे वाटचाल करत आहे, तर

मुस्लीमबहुल भागात एनडीएची सरशी

पटना : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने

पर्यावरणवादी पद्मश्री सालूमरदा थिमक्का यांचे निधन

वयाच्या ११४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास नवी दिल्ली : प्रसिद्ध पर्यावरणवादी, पद्मश्री पुरस्कार विजेत्या

बिहारच्या निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस-उबाठा सेनेत कलगीतुरा

अंबादास दानवे यांच्या टीकेला भाई जगताप यांचे प्रत्त्युतर मुंबई  : मतमोजणीदरम्यान बिहारमध्ये कोणाचे सरकार

जम्मू-काश्मिरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट! फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांची तपासणी करताना उडाला भडका

श्रीनगर: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरण ताजे असतानाच जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमधील नौगाम