मुंबईमध्ये हजारो मुले शाळाबाह्य

मुंबई : शहरातील शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी शोध मोहीम राबविण्यात येते. त्यानुसार सरत्या शैक्षणिक वर्षांत (२०२४-२५) मुंबई शहरातून तब्बल ४ हजार ५५५ शाळाबाह्य मुलांची नोंद झाली आहे. त्या सर्व मुलांना पुन्हा शाळेत आणण्यात शिक्षकांना यश आले आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षकांनी ४ हजार १७८ मुले तर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून ३७७ मुले गेल्यावर्षी शाळेत दाखल करण्यात आली.


बालकांचा सक्तीचा मोफत शिक्षण कायद्यांतर्गत बालकांना मोफत सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक असतानाही दरवर्षी राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य मुले निदर्शनास येतात.


मुंबईतही हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुंबईच्या विविध ठिकाणी राहणारी स्थलांतरितांची मुले तसेच झोपडपट्टी, रस्ते, सिग्नल परिसरात राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जातात.

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा