मुंबईमध्ये हजारो मुले शाळाबाह्य

मुंबई : शहरातील शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी शोध मोहीम राबविण्यात येते. त्यानुसार सरत्या शैक्षणिक वर्षांत (२०२४-२५) मुंबई शहरातून तब्बल ४ हजार ५५५ शाळाबाह्य मुलांची नोंद झाली आहे. त्या सर्व मुलांना पुन्हा शाळेत आणण्यात शिक्षकांना यश आले आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षकांनी ४ हजार १७८ मुले तर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून ३७७ मुले गेल्यावर्षी शाळेत दाखल करण्यात आली.


बालकांचा सक्तीचा मोफत शिक्षण कायद्यांतर्गत बालकांना मोफत सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक असतानाही दरवर्षी राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य मुले निदर्शनास येतात.


मुंबईतही हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुंबईच्या विविध ठिकाणी राहणारी स्थलांतरितांची मुले तसेच झोपडपट्टी, रस्ते, सिग्नल परिसरात राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जातात.

Comments
Add Comment

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा