महाराष्ट्र

जेष्ठ अर्थतज्ञ डॉ प्रशांत भालेराव यांचा राजधानी दिल्लीतही प्रभाव

  103

शेवगाव : देशाच्या अर्थकारणात अग्रगण्य असलेल्या श्री रेणुका माता मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी या संस्थेचे संस्थापक जेष्ठ अर्थतज्ञ डॉ प्रशांत चंद्रकांत भालेराव यांची "दि असोसिएट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया"च्या संचालकपदी नियुक्ती झाल्यापासून डॉ.भालेराव यांचे कार्यक्षेत्राच्या दिशा कमालीच्या रुंदावल्या आहेत.देशाच्या राजधानी दिल्लीतही त्याचा प्रभाव वाढला आहे.


डॉ भालेराव यांच्या श्री रेणुका माता मल्टीस्टेट संस्थेच्या व दिल्ली येथे कार्यरत असलेल्या महाराष्ट्राच्या सुकन्या,जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या धनश्री देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीच्या मंडी हाऊस मध्ये नुकताच एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.डॉ.भालेराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यातील विविध क्षेत्रातील ज्येष्ठ,श्रेष्ठ,आणि विशेषतः टॉपवर असलेल्या,उद्योग व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने देशात व देशाबाहेर ठिकठिकाणी विखुरलेल्या सिनिअर आय ए एस केडरच्या महाराष्ट्रीयन मान्यवरांना एका मंचावर अनौपचारिक रित्या एकत्र आणण्याचा, व त्यांच्या सहवासातून , विचारमंथनातून राज्याबद्दलची अस्मिता जागृत व्हावी; त्यांच्या ज्ञानाचा लाभ पुढील पिढीला व्हावा ' या उदात्त हेतूने आयोजित एक स्तुत्य उपक्रम संपन्न झाला आहे.



यावेळी पहिल्याच उपक्रमाला त्याच तोलामोलाच्या हस्ती लाभत्याची भावना दि असोसिएट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया" चे संचालक ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ प्रशांत भालेराव यांनी व्यक्त करून या सोहळ्याचे अध्यक्ष, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी माजी पथक प्रमुख, ( एन आय ए चे ) विद्यमान महासंचालक सदानंद दाते यांना सन्मानित करण्यात आला.यावेळी केंद्रिय क्रीडा विभागाच्या माजी सचिव, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या माजी प्रादेशिक उप महासंचालक तथा लोकसेवा आयोग्याच्या विद्यमान सदस्या सुजाता चतुर्वेदी,न्यूयॉर्क मध्ये भारतीय कौन्सिल जनरल ज्ञानेश्वर मुळे,तामिळनाडूतील सेक्रेटरी श्री खाडे,सतिषकुमार घोरमाडे,शालेय शिक्षण सचिव आनंदराव पाटील,आदि अत्युच्च पदावर कार्यरत असलेल्या अडीचशे मान्यवरांची या सोहळ्यास उपस्थिती होती.


यावेळी नगर दक्षिणचे खा.निलेश लंके,नाशिकचे खा.भास्कर भगरे,माजी आ.बाळासाहेब मुरकुटे,येथील रेणुका परिवार सदस्य डॉ अरविंद पोटफोडे, हेही उपस्थित होते.राज्याच्या तमाम जनतेचे आवडते सिने अभिनेते अशोक सराफ यांना २६ में रोजी भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. त्यांचेही कौतुक या उपक्रमात करण्यात आले .पद्म पुरस्काराचे वितरण होण्याच्या पूर्वसंध्येलाच, " एक उजाड संध्याकाळ " सिने अभिनेते अशोक सराफ यांचे बरोबर गप्पा टप्पा मारत विविध प्रश्न उत्तराची देवाणघेवाण करत संवाद साधण्यात आला.समाजिक कार्यकर्त्या धनश्री देशमुख यांनी उत्तम सुत्रसंचलन करून आभार मानले.

Comments
Add Comment

Ashadhi Wari 2025 Special Bus : पंढपूर विशेष बससेवा; आषाढी वारीसाठी स्वारगेट एसटी आगाराकडून नियोजन

पुणे : आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन

पुण्यात चाललंय काय ? पतीची आत्महत्या, पत्नीला अटक

पुणे : काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणात

मुंबईत बीकेसीतील सेबी भवनात अजगरांच्या पिलांचा सुळसुळाट

मुंबई : यंदा मान्सूनचे आगमन मे महिन्यातच झाले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली. यामुळे जशी