मुंबईतील म्हाडाच्या ९६ अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाश्यांना भाडे मिळणार - संजीव जयस्वाल

मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त इमारतींच्या पावसाळापूर्व सर्वेक्षणातील ९६ अतिधोकादायक इमारतींमधील भाडेकरू/रहिवाश्यांनी त्यांच्या स्तरावर वास्तव्याची पर्यायी व्यवस्था केल्यास मंडळामार्फत दरमहा २० हजार रुपये भाडे अदा करण्याचा निर्णय 'म्हाडा'चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी नुकताच जाहीर केला आहे.तसेच बाहय यंत्रणेमार्फत तीन वर्षाकरिता १८० ते २५० चौरस फुट क्षेत्रफळाचे ४०० गाळे अतिधोकादायक इमारतींतील भाडेकरू रहिवाश्यांकरिता भाडेतत्वावर घेण्याबाबत जाहिरात देण्याचे निर्देशही मंडळास दिले आहेत.


मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे पावसाळापूर्व सर्वेक्षणात ९६ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या अतिधोकादायक इमारतींमध्ये सुमारे २४०० भाडेकरू/रहिवासी वास्तव्यास असून त्यांना तातडीने संक्रमण शिबीरात स्थलांतरित करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत मंडळाकडे फक्त ७८६ संक्रमण गाळे उपलब्ध असल्याने अतिधोकादायक इमारतींमधील भाडेकरू/रहिवासी यांना तात्पुरत्या स्वरुपात संक्रमण शिबिरांतून पर्यायी निवासाची व्यवस्था देणे मंडळास शक्य नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सदर भाडेकरू/रहिवासी यांच्या जीवितास धोका पोहचू नये व त्यांची मुंबईत इतरत्र निवासाची पर्यायी व्यवस्था देणे आवश्यक असल्याने 'म्हाडा'चे उपाध्यक्ष जयस्वाल यांनी सदर निर्णय घेतला आहे.


वरील दोन्ही प्रकारे होणारा खर्च सदर इमारतीच्या जागेवर पुनर्विकासासाठी खाजगी विकासकांना, सहकारी गृहनिर्माण संस्था यांना विकासासाठी दिल्यास सदर विकासकांना ज्या दिवसापासून मंडळामार्फत प्रति माह रू. २०,०००/- भाडे अदा करण्यात आले आहे अथवा बाहय यंत्रणेमार्फत तीन वर्षाकरिता १८० चौ. फुट ते २५० चौ. फुट क्षेत्रफळाचे ४०० गाळे भाडयाने घेतलेले आहे त्याचा देखभालीसह संपूर्ण खर्च विकासकाने व सहकारी गृहनिर्माण संस्था यांनी भरणे बंधनकारक राहिल, असाही निर्णय जयस्वाल यांनी घेतला आहे. मुंबई शहर जिल्ह्यात आता प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या उपकरप्राप्त इमारतींची संख्या एकूण १३,०९१ आहे. मंडळाकडे एकूण २०,५९१ संक्रमण गाळे आहेत.

Comments
Add Comment

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला

महाराष्ट्रात मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई - शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सर्व माध्यमे, सर्व भाषिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक मुंबई : "महाराष्ट्रातील सर्व

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र कोकणात करा; आमदार प्रवीण दरेकरांची सरकारकडे मागणी

मुंबई : हिंगोली येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या धर्तीवर कोकणातही या केंद्राचे उपकेंद्र स्थापन

कृत्रिम फुले आणि खेळण्यांच्या रंगांमुळे कर्करोगाचा धोका; विक्रम पाचपुते यांचा इशारा

मुंबई: विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी एक गंभीर

Holi Special ST Buses : होळीसाठी धावणार एसटीच्या १९३ बस; महामंडळातर्फे विशेष सेवा जारी

मुंबई : राज्यभरात होळीच्या सणाची तयारी सुरु झालीये. देवांच्या पालख्या घरोघरी येऊ लागल्या आहेत, त्यामुळे