मायक्रोसॉफ्टकडून पुन्हा ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचे सत्र सुरुच आहे. कंपनीने ३०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. काही आठवड्यांपूर्वीच कंपनीने ६,००० लोकांना कामावरून कमी केले होते. कंपनीने नेमके कोणते कर्मचारी किंवा विभाग यावेळी कमी केले, हे सांगितलेले नाही. पण मागील वेळेस सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि प्रोजेक्ट मॅनेजर यांना जास्त फटका बसला होता. याहीवेळी ही अशाच पदांवर परिणाम झाल्याची शक्यता आहे.

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला म्हणाले की, ही कर्मचाऱ्यांची कपात चुकीच्या कामासाठी नाही, तर कंपनीची पुढील योजना लक्षात घेऊन केली आहे. कंपनी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर भर देत आहे. काही प्रकल्पांमध्ये ३०% कोड एआयद्वारे तयार होत असल्याचेही स्पष्ट केले आहे. यासाठी मायक्रोसॉफ्टने ८० अब्ज डॉलर्स खर्च करण्याची घोषणा केली आहे.




सध्या मायक्रोसॉफ्टमध्ये सुमारे २.२८ लाख कर्मचारी कार्यरत असून, कंपनीने नवीन कामगिरी मूल्यांकन प्रणाली आणि ऐच्छिक विभक्ती योजनेसह पुनर्रचना सुरू ठेवली आहे. तर कंपनीने नवीन नियमही लागू केले आहेत. जर कोणाची कामगिरीमुळे नोकरी गेली असेल, तर त्या व्यक्तीला दोन वर्षांनीच पुन्हा नोकरी मिळू शकते. तसेच काही लोकांना ऐच्छिक निवृत्तीवर १६ आठवड्यांचे वेतनही दिले जात आहे.

Comments
Add Comment

महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने

मुंबई: महिला व बाल विकास विभागातील सर्व पदांच्या बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याची

RR VS DC : कर्णधार रियान परागलाच हटवले, वाचा कोण झाला नवा कर्णधार ?

IPL 2026 : आयपीएल २०२६ चा ५२ वा सामना आज जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू आहे. दुखापतीमुळे या सामन्यातून

महाराष्ट्राच्या विकासाच्या आलेखाची राष्ट्रीय स्तरावर दखल

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ 'बालस्नेही' आणि 'जलसमृद्धी'मध्ये राज्यातील ग्रामपंचायती देशात प्रथम नवी दिल्ली :

Nashik TCS Case : नाशिक ‘कॉर्पोरेट जिहाद’प्रकरणी ५० पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

मुंबई : नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील ‘कॉर्पोरेट जिहाद’प्रकरणी सखोल चौकशी करून राष्ट्रीय महिला आयोगाने

Sindhudurg : सिंधुदुर्गात अवकाळीचे तांडव, ४१ घरांची पडझड, लाखोंचे नुकसान

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटांसह

Ratnagiri : रत्नागिरीत वादळाने विद्युतपुरवठा विस्कळित

रत्नागिरी : रत्नागिरीत आज संध्याकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची दाणादाण उडाली. यावर्षी