Indigo News : रांचीमध्ये विमानाचं आपत्कालीन लँडिंग! ४ हजार फुटांवर प्रवाशांचा जीव धोक्यात

४० मिनिटे हवेत अडकली Flight


रांची: रांचीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला पक्षी धडकल्याने (Bird Hit IndiGo plane) विमानाचे आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. हे विमान पटणा वरुण रांचीकडे येत होते. या विमानात १७५ प्रवासी प्रवास करत होते. रांचीतील बिरसा मुंडा विमानतळावर फ्लाइट- ६ ई ६१५२ उतरत असताना ही घटना घडली. पक्षी विमानाच्या पुढच्या भागावर आदळला. त्यानंतर, पायलटने विमान धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरवले. पक्ष्याच्या धडकेची माहिती मिळताच, विमानतळ प्राधिकरणाची टीम घटनास्थळी पोहोचली. विमानाचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही याची खात्री करण्यासाठी तांत्रिक टीम विमानाची तपासणी करत आहे. जोपर्यंत संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत विमानाला उड्डाण करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.




४ हजार फूट उंचीवर विमानाला धडकला पक्षी


मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे विमान सुमारे ४ हजार फूट उंचीवर उड्डाण करत असताना एका गिधाडाला धडकले. त्यानंतर पायलटने तातडीने विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. विमानाचे लँडिंग यशस्वी झाले. तथापि, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. इंडिगोच्या या विमानात सुमारे १७५ प्रवासी होते. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.




नेमकं काय झालं?


बिरसा मुंडा विमानतळ संचालक आरआर मौर्य यांनी पीटीआयला सांगितले की, रांचीजवळ इंडिगोच्या एका विमानाला पक्ष्याने धडक दिली. ही घटना घडली तेव्हा विमान येथून सुमारे १० ते १२ नॉटिकल मैल अंतरावर, सुमारे ३ ते ४ हजार फूट उंचीवर होते. हे इंडिगो विमान पाटण्याहून रांचीला येत होते. गिधाडाने विमानाला धडक दिल्याने विमानाचे नुकसान झाले आहे. अभियंते नुकसानीचे मूल्यांकन करत आहेत. ही घटना दुपारी १.१४ वाजता घडली.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात