Indigo News : रांचीमध्ये विमानाचं आपत्कालीन लँडिंग! ४ हजार फुटांवर प्रवाशांचा जीव धोक्यात

४० मिनिटे हवेत अडकली Flight


रांची: रांचीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला पक्षी धडकल्याने (Bird Hit IndiGo plane) विमानाचे आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. हे विमान पटणा वरुण रांचीकडे येत होते. या विमानात १७५ प्रवासी प्रवास करत होते. रांचीतील बिरसा मुंडा विमानतळावर फ्लाइट- ६ ई ६१५२ उतरत असताना ही घटना घडली. पक्षी विमानाच्या पुढच्या भागावर आदळला. त्यानंतर, पायलटने विमान धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरवले. पक्ष्याच्या धडकेची माहिती मिळताच, विमानतळ प्राधिकरणाची टीम घटनास्थळी पोहोचली. विमानाचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही याची खात्री करण्यासाठी तांत्रिक टीम विमानाची तपासणी करत आहे. जोपर्यंत संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत विमानाला उड्डाण करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.




४ हजार फूट उंचीवर विमानाला धडकला पक्षी


मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे विमान सुमारे ४ हजार फूट उंचीवर उड्डाण करत असताना एका गिधाडाला धडकले. त्यानंतर पायलटने तातडीने विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. विमानाचे लँडिंग यशस्वी झाले. तथापि, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. इंडिगोच्या या विमानात सुमारे १७५ प्रवासी होते. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.




नेमकं काय झालं?


बिरसा मुंडा विमानतळ संचालक आरआर मौर्य यांनी पीटीआयला सांगितले की, रांचीजवळ इंडिगोच्या एका विमानाला पक्ष्याने धडक दिली. ही घटना घडली तेव्हा विमान येथून सुमारे १० ते १२ नॉटिकल मैल अंतरावर, सुमारे ३ ते ४ हजार फूट उंचीवर होते. हे इंडिगो विमान पाटण्याहून रांचीला येत होते. गिधाडाने विमानाला धडक दिल्याने विमानाचे नुकसान झाले आहे. अभियंते नुकसानीचे मूल्यांकन करत आहेत. ही घटना दुपारी १.१४ वाजता घडली.

Comments
Add Comment

बिहारमध्य राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या