Indigo News : रांचीमध्ये विमानाचं आपत्कालीन लँडिंग! ४ हजार फुटांवर प्रवाशांचा जीव धोक्यात

४० मिनिटे हवेत अडकली Flight


रांची: रांचीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला पक्षी धडकल्याने (Bird Hit IndiGo plane) विमानाचे आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. हे विमान पटणा वरुण रांचीकडे येत होते. या विमानात १७५ प्रवासी प्रवास करत होते. रांचीतील बिरसा मुंडा विमानतळावर फ्लाइट- ६ ई ६१५२ उतरत असताना ही घटना घडली. पक्षी विमानाच्या पुढच्या भागावर आदळला. त्यानंतर, पायलटने विमान धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरवले. पक्ष्याच्या धडकेची माहिती मिळताच, विमानतळ प्राधिकरणाची टीम घटनास्थळी पोहोचली. विमानाचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही याची खात्री करण्यासाठी तांत्रिक टीम विमानाची तपासणी करत आहे. जोपर्यंत संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत विमानाला उड्डाण करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.




४ हजार फूट उंचीवर विमानाला धडकला पक्षी


मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे विमान सुमारे ४ हजार फूट उंचीवर उड्डाण करत असताना एका गिधाडाला धडकले. त्यानंतर पायलटने तातडीने विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. विमानाचे लँडिंग यशस्वी झाले. तथापि, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. इंडिगोच्या या विमानात सुमारे १७५ प्रवासी होते. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.




नेमकं काय झालं?


बिरसा मुंडा विमानतळ संचालक आरआर मौर्य यांनी पीटीआयला सांगितले की, रांचीजवळ इंडिगोच्या एका विमानाला पक्ष्याने धडक दिली. ही घटना घडली तेव्हा विमान येथून सुमारे १० ते १२ नॉटिकल मैल अंतरावर, सुमारे ३ ते ४ हजार फूट उंचीवर होते. हे इंडिगो विमान पाटण्याहून रांचीला येत होते. गिधाडाने विमानाला धडक दिल्याने विमानाचे नुकसान झाले आहे. अभियंते नुकसानीचे मूल्यांकन करत आहेत. ही घटना दुपारी १.१४ वाजता घडली.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला