अकरावी ऑनलाईन फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ, ५ जूनपर्यंत करता येणार नोंदणी


मुंबई(प्रतिनिधी): इयत्ता ११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ अंतर्गत विद्यार्थी नोंदणीसाठी दिनांक २६ मे २०२५ ते ३ जून २०२५ हा कालावधी देण्यात आला होता. ६ मे २०२५च्या शासन निर्णयातील तरतुदीबाबत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयातील इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदलाबाबत शासनाने ३१ मे रोजीच्या पत्रान्वये आदेश दिले असल्याने आता या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी ५ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे प्र. शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी कळविले आहे.


या पत्रानुसार इन-हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्व माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित असतील. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळाकरीता एक युनिट ग्राह्य धरण्यात येत आहे.


राज्यातील उर्वरित जिल्ह्यांकरीता त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय / वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसूली जिल्ह्यांमध्ये एक यूनिट इन-हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे. या बदलाच्या अनुषंगाने संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांच्या संस्थांच्या शाळांचा बदल करण्यासाठी तसेच विद्याथ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाने केलेल्या बदलाच्या अनुषंगाने इन-हाऊस कोटामधील पसंतीक्रम आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना तसेच पालक / विद्यार्थी यांना पुरेसा वेळ मिळावा यास्तव विद्यार्थी नोंदणी अंतिम दिनांक ३ जून ऐवजी सुधारित मुदतवाढीसह आता ५ जून २०२५ रोजी दुपारी २ पर्यंत करण्यात येत आहे.


इयत्ता ११ वी प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थी / पालक यांनी विद्यार्थी नोंदणी https://ma-hafyjcadmissions.in या संकेतस्थळावर लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यापुढील वेळापत्रक यापूर्वी प्रकाशित केल्याप्रमाणे राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. आज दिनांक २ जून २०२५ रोजी सायंकाळपर्यंत एकूण १० लाख ८५ हजार ८५१विद्याथ्यांनी नोंदणी केली असून पुणे विभाग-१, ८७,९२५: मुंबई विभाग-२,६५,९००; कोल्हापूर विभाग-१,०७,०१२; छत्रपती संभाजीनगर विभाग- १,००,०४०; नाशिक विभाग १.१२.१०८; नागपूर विभाग ९५,२१०; अमरावती विभाग ९८३५९: लातूर विभाग-५८,५८६ आणि इतर- ६१,७१२अशी नोंदणी झाली असल्याची माहिती डॉ. पानझाडे यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather : जुलै संपत आला तरी महाराष्ट्रातील आठ जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातीळ अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहा:कार माजवला आहे. एका बाजूला कोकण आणि उत्तर

Government Hospitals : आता सरकारी रुग्णालयांतील ‘पेशंट’ ठरवणार डॉक्टरांचे रिपोर्ट कार्ड

राज्य सरकारचा निर्णय; हॉटेल्सप्रमाणे सरकारी दवाखान्यांनाही मिळणार स्टार रेटिंग मुंबई(Mumbai) : सरकारी रुग्णालयाचे

Israel Employment : इस्त्रायलमध्ये रोजगारासाठी निवडलेल्या उमेदवारांना इस्त्रायली मानकांनुसार निवासी प्रशिक्षण

पहिल्या टप्प्यातील १०६ उमेदवारांना औंध, पुणे येथे २७ ते ३१ जुलैदरम्यान प्रशिक्षण मुंबई(Mumbai) : राज्यातील युवकांना

Corporate Social Responsibility : महाराष्ट्रातील एकूण सीएसआर निधीपैकी ५१ टक्के एकट्या मुंबईत खर्च

वाटपात मोठी विषमता; मागास आणि दुष्काळी जिल्ह्यांच्या वाट्याला अतिशय तुटपुंजी रक्कम मुंबई(Mumbai) : कॉर्पोरेट सोशल

Mumbai Police Viral Video : आंदोलक विद्यार्थिनीशी पोलिसांकडून गैरवर्तन नाही!

- व्हायरल व्हिडिओवर मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण मुंबई : मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान साध्या वेशातील

Security tightened : राज्यातील संवेदनशील ठिकाणे आणि वरिष्ठ नेत्यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ

मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद उमटण्याची शक्यता आणि आगामी राजकीय मोर्चे लक्षात घेता महाराष्ट्र