शरद पवारांचे निष्ठावंत अजित पवारांच्या गटात जाणार! कोण आहे 'हा' नेता?

हिंगोलीतील एक प्रमुख नेता शरद पवारांची साथ सोडणार, हातात घालणार अजित पवारांचे घडयाळ! 


हिंगोली: गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडीची प्रकरणं प्रचंड पाहायला मिळाली. सर्वप्रथम एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनीही काका शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांच्या पक्षाचे सीमोल्लंघन करत आपला नवा राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला. त्यानंतरच्या काळातही बरेच नेते सत्ताधारी पक्षांमध्ये सामील झाले. अशातच आता शरद पवारांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे. हिंगोलीतील एक प्रमुख नेता शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.


हिंगोली येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावंत नेते अनिल पतंगे (Anil Patange) अजित पवार यांच्या गटात सामील होणार आहेत. पतंगे यांच्यासह अनेक कार्यकर्तेही शरत पवारांची साथ सोडणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना हिंगोलीतून हा सर्वात मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहेत.



"शरद पवार यांच्यावर कोणती नाराजी नाही"


अनिल पतंगे यांनी शरद पवारांची साथ का सोडणार या प्रश्नावर बोलताना सांगितले की, ‘शरद पवार यांच्यावर आमची कोणतेही नाराजी नाही. मात्र काळानुसार कार्यकर्त्यांचा आग्रह होता. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मागील १० वर्षापासून आम्ही सातत्याने विरोधात बसतोय. याचा परिणाम विकास कामावर होत आहे, त्यामुळे आम्ही सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.’



८ जूनला पक्षप्रवेश होणार


दिनांक ८ जून रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीत अनिल पतंगे पक्षप्रवेश करणार असल्याचं समजत.  अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत बोलताना अनिल पतंगे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, ‘सेनगाव नगरपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, हजारो कार्यकर्त्यांसह आम्ही ८ तारखेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहोत. सेनगाव येथे हा पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम पार पडणार आहे.’

Comments
Add Comment

नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर, अंबरनाथमध्ये शिवसेनेला दिलासा; भाजपाला मोठा धक्का

अंबरनाथ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची मानली जाणारी अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ६७.६३ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी मतदान

महाराष्ट्र ‘राजभवन; झाले आता ‘लोकभवन’

मुंबई : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे

सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला

मुंबई : राज्यातील सर्व २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च

महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीला राड्यांचे ग्रहण

मुंबई : महाराष्ट्रातील २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मंगळवार २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झाले. मतदानाची वेळ

महाराष्ट्रात किती नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती अखेर आकडा समोर, निवडणूक आयोगाकडून सुधारीत कार्यक्रम जाहीर

मुंबई : महाराष्ट्रातील काही नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पूर्णपणे स्थगित करण्याचा तर काही ठिकाणी नगर