माथेरान येथे वाहतूक कोंडीचा तिढा कायमच; पर्यटकांचे हाल

ठोस उपाययोजना नाही; लक्ष देण्याची प्रवाशांची मागणी


माथेरान : दरवेळी सुट्ट्यांच्या हंगामात माथेरान दस्तुरी नाक्यावर आणि घाटरस्त्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेहमीच्या या वाहतूक कोंडीचा तिढा सोडविण्यासाठी प्रशासनाने जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचे सर्वच स्तरातून बोलले जात आहे.



शनिवारी आणि रविवारी माथेरानला पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नेरळ माथेरान हा एकमेव घाटरस्ता असल्याने आणि दस्तुरी वाहन पार्किंगमध्ये अपुरी पार्किंग व्यवस्था यामुळे पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मुंबई-पुण्यापासून जवळचे ठिकाण असल्याने माथेरानला सर्वाधिक पसंती दिली जाते त्यामुळे इथे पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. प्रवासी कर आणि वाहन कराच्या माध्यमातून नगरपालिका आणि वनखात्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न प्राप्त होते. परंतु येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक सेवासुविधा देण्यासाठी शासन स्तरावर आजमितीपर्यंत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. जग एकविसाव्या शतकात वाटचाल करत असताना इथे अद्यापही पर्यायी व्यवस्था निर्माण होऊ शकली नाही. जो पर्यटक आपल्या लहान मुलांना, वयोवृद्ध आई-वडिलांना इथे फिरावयास घेऊन येतो त्यांना साधी वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही. ही लाजिरवाणी बाब असल्याचे ज्येष्ठ मंडळी बोलत आहेत.

Comments
Add Comment

Voter List Update : मतदारयादी पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंची घरभेट

रायगड : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' (SIR) मोहीम

Raigad Ropeway: रायगडावर जाणे होणार स्वस्त! रोपवेचे तिकीट ३५० रुपयांवरून ५०-१०० रुपयांपर्यंत कमी होणार

रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने रायगडावर नवीन रोपवे

Eknath Shinde : रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईक स्वाराला दिला मदतीचा हात

विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात केले दाखल रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३

Eknath Shinde: रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा मुंबई :

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले