माथेरान येथे वाहतूक कोंडीचा तिढा कायमच; पर्यटकांचे हाल

ठोस उपाययोजना नाही; लक्ष देण्याची प्रवाशांची मागणी


माथेरान : दरवेळी सुट्ट्यांच्या हंगामात माथेरान दस्तुरी नाक्यावर आणि घाटरस्त्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेहमीच्या या वाहतूक कोंडीचा तिढा सोडविण्यासाठी प्रशासनाने जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचे सर्वच स्तरातून बोलले जात आहे.



शनिवारी आणि रविवारी माथेरानला पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नेरळ माथेरान हा एकमेव घाटरस्ता असल्याने आणि दस्तुरी वाहन पार्किंगमध्ये अपुरी पार्किंग व्यवस्था यामुळे पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मुंबई-पुण्यापासून जवळचे ठिकाण असल्याने माथेरानला सर्वाधिक पसंती दिली जाते त्यामुळे इथे पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. प्रवासी कर आणि वाहन कराच्या माध्यमातून नगरपालिका आणि वनखात्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न प्राप्त होते. परंतु येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक सेवासुविधा देण्यासाठी शासन स्तरावर आजमितीपर्यंत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. जग एकविसाव्या शतकात वाटचाल करत असताना इथे अद्यापही पर्यायी व्यवस्था निर्माण होऊ शकली नाही. जो पर्यटक आपल्या लहान मुलांना, वयोवृद्ध आई-वडिलांना इथे फिरावयास घेऊन येतो त्यांना साधी वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही. ही लाजिरवाणी बाब असल्याचे ज्येष्ठ मंडळी बोलत आहेत.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरातचा उरणमध्ये जमीन खरेदी विक्रीत कोट्यवधींचा झोलझाल

रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या