जिल्ह्यातील घटस्फोटांचे प्रमाण चिंताजनक

वर्षभरात १३५ तक्रारी दाखल, १३ प्रकरणांमध्येच झाला समेट


अलिबाग : दोन विवाहित लोकांमध्ये कायदेशीररित्या त्यांचे वैवाहिक संबंध तोडण्याचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे. तसेच वैष्णवी सारख्या अनेक हुंडाबळी प्रकरण घडत असून कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना न्यायासाठी झुंज द्यावी लागत आहे.


काही वेळा त्यांना आपला जीवही गमवावा लागतो. मात्र योग्य वेळीच मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळाले तर काहीच संसार वाचू शकतो. अथवा ती महिला शाररिक व मानसिक छळापासून वाचू शकेल. यासाठी रायगड पोलिसांनी भरोसा सेल सुरू केला आहे. यामध्ये कौटुंबिक कलहाच्या प्रकरणांमध्ये समेट घडवून आणला जात आहे. कौटुंबिक हिंसाचारात घट व्हावी म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सेल सुरू करण्यात आले आहेत. लैंगिक शोषण किंवा अन्य प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिला अथवा मुलीला न्यायासाठी दारोदार फिरावे लागते. अत्याचार पीडित महिला अथवा मुलीला समाजासोबतच अनेकदा नातेवाईकांकडूनही तिरस्काराची वागणूक मिळते. त्यामुळे अशा पीडित महिलांना न्याय देण्याचे कामही भरोसा सेलकडून करण्यात येत आहे.



जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२५ या वर्षात एकूण १३५ तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यापैकी १०४ जोडप्यांचे समुपदेशनही करण्यात आले. त्यानंतर तडजोडीअंती १३ जणांमध्ये समेट घडवून आणण्यात भरोसा सेलला यश आले आहे. यामध्ये अर्जदाराच्या विनंतीवरून १८ गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.तसेच महिलांप्रमाणेच भरोसा सेल पुरुषांनादेखील मदतनीस ठरत आहे.

Comments
Add Comment

आपली पोरं सांभाळू शकले नाहीत, ते मुंबई काय सांभाळणार?

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली

आंबा बागेमध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव

खालापूर : थंडीच्या दिवसात आंब्यांना उत्तम मोहर आला आहे. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात थंडीमुळे आंब्यावर

जिल्ह्यात ८ हजार ५८ हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी

यंदा १२ हजार ६३४.३५ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, भाजीपाला लागवड अलिबाग : भाताचे कोठार म्हणून रायगडाची ओळख पुसली

परिवर्तन विकास आघाडीला मतदारांचा कौल

डॉक्टर, वकील शिक्षित उमेदवारांना मतदारांनी नाकारले ! राहुल देशमुख कर्जत : नगराध्यक्षपदासाठी परिवर्तन विकास

नवी मुंबई विमानतळावरून उद्यापासून उड्डाणे

नवी मुंबई : भारताच्या पायाभूत विकासाच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

अलिबागमध्ये शेकापला रोखण्यात भाजप, शिवसेना अपयशी

उबाठाचे दोन शिलेदार विजयी, भाजपाला एकच जागा सुभाष म्हात्रे अलिबाग : अलिबाग नगर परिषदेत महाविकास आघाडीतील