जिल्ह्यातील घटस्फोटांचे प्रमाण चिंताजनक

वर्षभरात १३५ तक्रारी दाखल, १३ प्रकरणांमध्येच झाला समेट


अलिबाग : दोन विवाहित लोकांमध्ये कायदेशीररित्या त्यांचे वैवाहिक संबंध तोडण्याचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे. तसेच वैष्णवी सारख्या अनेक हुंडाबळी प्रकरण घडत असून कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना न्यायासाठी झुंज द्यावी लागत आहे.


काही वेळा त्यांना आपला जीवही गमवावा लागतो. मात्र योग्य वेळीच मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळाले तर काहीच संसार वाचू शकतो. अथवा ती महिला शाररिक व मानसिक छळापासून वाचू शकेल. यासाठी रायगड पोलिसांनी भरोसा सेल सुरू केला आहे. यामध्ये कौटुंबिक कलहाच्या प्रकरणांमध्ये समेट घडवून आणला जात आहे. कौटुंबिक हिंसाचारात घट व्हावी म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सेल सुरू करण्यात आले आहेत. लैंगिक शोषण किंवा अन्य प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिला अथवा मुलीला न्यायासाठी दारोदार फिरावे लागते. अत्याचार पीडित महिला अथवा मुलीला समाजासोबतच अनेकदा नातेवाईकांकडूनही तिरस्काराची वागणूक मिळते. त्यामुळे अशा पीडित महिलांना न्याय देण्याचे कामही भरोसा सेलकडून करण्यात येत आहे.



जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२५ या वर्षात एकूण १३५ तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यापैकी १०४ जोडप्यांचे समुपदेशनही करण्यात आले. त्यानंतर तडजोडीअंती १३ जणांमध्ये समेट घडवून आणण्यात भरोसा सेलला यश आले आहे. यामध्ये अर्जदाराच्या विनंतीवरून १८ गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.तसेच महिलांप्रमाणेच भरोसा सेल पुरुषांनादेखील मदतनीस ठरत आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग