रायगड किल्ल्यावर उत्खननात सापडले 'यंत्रराज'

किल्ले रायगड : रायगड किल्ल्यावर भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण संयुक्तपणे उत्खनन सुरू केले आहे. या उत्खननात ‘यंत्रराज’ अर्थात सौम्ययंत्र (Astrolabe) हे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण सापडल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितले.

खगोलशास्त्रीय अभ्यास करून तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गराज रायगडाचे बांधकाम झाले होते, याबाबतचा हा महत्त्वपूर्ण पुरावा आहे. हे उपकरण ग्रहताऱ्यांचा अभ्यास, दिशा शोधणे आणि वेळ मोजणे यासाठी वापरले जात असे. त्याच्या सहाय्याने अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त आणि विषुववृत्तांचा अभ्यास केला जायचा; असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

रायगड किल्ल्यावर मागील काही वर्षांपासून वेगवेगळ्या भागांमध्ये उत्खनन सुरू आहे. रोपवेच्या मागच्या बाजूस, कुशावर्त तलावाजवळ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर परिसरात उत्खनन सुरू आहे. हे काम सुरू असताना कुशावर्त तलावाच्या वरील बाजूस वाडेश्वर मंदिराच्या मधल्या भागात हे यंत्र आढळले.

यंत्रावर कोरलेल्या अक्षरांमध्ये “मुख” आणि “पूंछ” असे स्पष्ट उल्लेख आहेत, जे उत्तर-दक्षिण दिशांचा अंदाज लावण्यासाठी वापरले जात असावेत. तसेच मध्यभागी कोरलेले कासव आणि साप यावरुन ही वस्तू प्राचीन भारतीय शिल्प परंपरेचा भाग असण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

सापडलेल्या यंत्रामुळे रायगडाच्या इतिहासाशी संबंधित नवी माहिती मिळण्याची शक्यता वाढली आहे. भविष्यातील संशोधनासाठी हा एक अमूल्य ठेवा आहे.

Comments
Add Comment

Nagpur News: नागपुरात आयकर विभागाची व्यापाऱ्यावंर मोठी कारवाई

नागपूर : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच नागपूर शहरात आयकर विभागाने मोठी धडक कारवाई करत

Mumbai - Pune Expressway : अटल सेतुपासुन थेट पुण्यापर्यंत ९० मिनिटात,नक्की मार्ग काय ?

Mumbai - Pune Expressway : मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांरीकांना मोठा

मनपा निवडणुकीच्या निकालानंतर कोल्हापुरात काँग्रेसला धक्का

गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

जे साथ देतील त्यांच्यासोबत, अन्यथा त्यांच्याशिवाय पुढे जाऊ!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राजकारणात कोणीही शत्रू नाही

मुंबई : “निवडणुका संपल्या, आता आमचा कोणीही शत्रू नाही. जे असतील, ते आमचे वैचारिक विरोधक आहेत. त्यामुळे मुंबईच्या

मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणताही वाद नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणताही वाद नाही महापौरपदाचा निर्णय एकनाथ शिंदे, मी आणि दोन्ही पक्षांचे वरिष्ठ

दिल्लीसह चार राज्यांत सतर्कतेचा इशारा; २६ जानेवारीआधी सुरक्षायंत्रणा अलर्ट मोडवर

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्ली तसेच हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान