यंदाच्या जी-७ शिखर परिषदेला पंतप्रधान अनुपस्थित राहणार

नवी दिल्ली : यंदाच्या जी-७ शिखर संमेलन कॅनडात १६-१७ जून रोजी पार पडणार आहे.ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार नाहीत. गेल्या सहा वर्षात पहिल्यांदा पंतप्रधान मोदी या संमेलनमध्ये उपस्थित नसणार आहे.भारत आणि कॅनडामधील सध्या तणावपूर्ण संबंधांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


कॅनडाकडून जी-७ संमेलनाचं आयोजन अल्बर्टामध्ये करण्यात आलं आहे. कॅनडाचे जी-७च्या प्रवक्त्यांनी याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही की पंतप्रधान मोदी या संमेलनाला हजेरी लावणार नाहीत. मात्र, कॅनडाकडून आलेल्या जी-७ परिषदेत सहभागी होण्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करण्याची शक्यता कमी आहे. यामागे प्रमुख कारण म्हणून कॅनडामधील खलिस्तानी कट्टरतावाद्यांचे वाढते अस्तित्व आणि भारताविरोधातील वातावरण हे दिले जात आहे.


सुरक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा भारतासाठी अत्यंत संवेदनशील आहे. अलीकडेच कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा सुधारण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.भारत आणि कॅनडामधील संबंध हळूहळू सुधारत असले तरी, पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी वेळ लागणार आहे. पंतप्रधान मोदी यांचा जी-७ परिषदेला संभाव्य गैरहजर राहणं हे त्याचेच निदर्शक मानलं जात आहे.या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील संबंधांवर आणि भविष्यातील व्यापार व सुरक्षा धोरणांवर दूरगामी परिणाम होऊ शकतात.माहितीनुसार, भारत-कॅनडा तणाव पाहता, जोपर्यंत दोन्ही देशांमधील संबंध सुधारत नाहीत, तोपर्यंत भारताकडून अशा उच्चस्तरीय दौऱ्याची शक्यता नाही.


कॅनडाकडून अद्याप अधिकृतरित्या या संमेलनात सहभागी होणाऱ्या गेस्ट लिडर्स अर्थात पाहुण्या नेत्यांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. पण कॅनडा मीडियाचा दावा आहे की, या संमेलनासाठी युक्रेन, साऊथ अफ्रिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या संमेलनाला जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे प्रमुखही सहभागी होणार आहेत. पण असं पहिल्यांदाच होणार आहे की, पंतप्रधान मोदी या संमेलनात सहभागी होणार नाहीत.

Comments
Add Comment

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.

Days In February : फेब्रुवारी महिन्यात 'इतके' दिवस बँका राहणार बंद! राज्यानुसार यादी जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दरवर्षी बँकांच्या सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर करत असते, ज्यामध्ये देशभरातील सार्वजनिक

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा'च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले विद्यार्थ्यांना 'हे' कानमंत्र

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या

Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, १८ जणांचा बळी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

शिलाँग : मेघालयातील जयंतिया हिल्स जिल्ह्यातील थांगस्कू परिसरात एका अवैध कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटाने

UPSC 2026 New Rules: यूपीएससी परीक्षेच्या नियमात महत्वाचे बदल; वाचा संपूर्ण माहिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ४ फेब्रुवारी रोजी नागरी सेवा परीक्षा (CSE) आणि भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा २०२६ साठी