Mumbai University Cracks Down : ४० लॉ महाविद्यालयांना प्रवेशबंदी; प्रवेशबंदी आणि १ लाखाचा दंड, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून ४० लॉ महाविद्यालयांना प्रवेशबंदी केल्याने चांगलाच दणका बसलेला आहे. मान्यता प्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केल्याने विधी अभ्यासक्रमांच्या ७४ पैकी ४० महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठाने नोटिसा पाठवून एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, या महाविद्यालयांची यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेशसंख्या शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्णवेळ प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केल्याने या महाविद्यालयांना १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंबई विद्यापीठाने या महाविद्यालयांना CET प्रवेशासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) देण्यास नकार दिला असून त्यामुळे यंदा ३ व ५ वर्षांच्या LLB अभ्यासक्रमात सुमारे ४ हजार प्रवेश जागा कमी होणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.



१० दिवसांत दंड न भरल्यास...


या महाविद्यालयांना अचानक दिलेल्या भेटी दरम्यान पायाभूत सुविधा आणि महाविद्यालयांत पूर्णवेळ प्राचार्य, प्राध्यापक नसल्याचे उघडकीस आले. मुंबई विद्यापीठाने दंड भरण्यासाठी या कॉलेजेसना १० दिवसांची मुदत दिली असून तेवढ्या कावलावधीत दंड भरली नाही तर दरमहा १.५% व्याज आकारले जाणार. मात्र, या निर्णयानंतर विद्यार्थी संघटनांनी संपूर्ण महाविद्यालयांवर समान कारवाईची मागणी केली असून विद्यापीठाच्या परवानगी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. ही विद्यालये केवळ कंत्राटी आणि तात्पुरत्या स्वरूपातील प्राध्यापकांच्या भरोश्यावर महाविद्यालये सुरू होती. त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर झाला होता. विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क आकारून देखील ही महाविद्यालये त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात अपयशी ठरली होती. तसेच, अनेक महाविद्यालयांत पायाभूत सुविधांची वानवा होती. त्यामुळे विद्यापीठाने या महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.




सरसकट कारवाई होणार


मुंबई विद्यापीठाने ७४ पैकी ४० विधी महाविद्यालयांची मान्यता रद्द केली आहे. मात्र, पूर्णवेळ प्राचार्य आणि पूर्णवेळ प्राध्यापक नसलेल्या सर्वच महाविद्यालयांवर सरसकट कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच, अशा महाविद्यालयांना परवानगी कशी दिली जाते, असा प्रश्न विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते ॲड. सचिन पवार यांनी उपस्थित केला.



असा होणार परिणाम


सीईटी सेलतर्फे लवकरच LLB आणि ५ वर्षे विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना सुरुवात केली जाईल. त्याकरिता महाविद्यालयांना नोंदणी करावी लागते. त्यासाठी विद्यापीठाचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि मान्यता दिलेल्या प्रवेश संख्येचे पत्र आवश्यक असते. यापूर्वी सीईटी सेलने महाविद्यालयांना नोंदणीसाठी ३० मेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, अनेक महाविद्यालयांची नोंदणी अपूर्ण आहे. त्यामुळे नोंदणीला २ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे यावर तोडगा न निघाल्यास या महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट होता येणार नाही.

Comments
Add Comment

अरुण गवळी कुटुंबाला धक्क्यावर धक्के

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रणागणांत कुख्यात गुंड अरुण गवळी यांच्या दोन मुलींसह वहिनीचा पराभव झाला

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या