मुंबईत यंदा मलेरिया-डेंग्यूच्या आजारात होणार वाढ

महापालिका राबवणार डास निर्मूलन मोहीम


मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत लक्षणीय वाढले आहे. यंदा मुदतपूर्व पावसामुळे राज्यात मलेरिया-डेंग्यूचे संकट गडद होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. मंबईतही यंदा मलेरिया-डेंग्यूसह साथेचे आजार मोठ्या प्रमाणात डोके वर काढणार असल्याचे पालिकेच्या डॉक्टारांचे म्हणणे आहे. यंदा मे महिन्याच्या शेवटाला, म्हणजे मुदतपूर्व मुसळधार पाऊस राज्यात कोसळला असल्यामुळे मुंबई, नागपूर, ठाणे तसेच गडचिरोली भागात साथीच्या आजारांचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रामुख्याने मुंबई ठाणे शहरात वारेमाप होणारे बांधकाम आणि ते कमी ठरावे म्हणून सिमेंटच्या रस्त्यांची काढलेली व अर्धवट राहिलेल्या कामांमुळे जागोजागी पाणी साचून साथींचा उद्रेक होण्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


मुंबईत आताच सर्दी-तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून करोनाचे रुग्ण कोणते व साथीच्या आजाराचे रुग्ण कोणते हे ओळखणेही अवघड झाले आहे. मुंबई महापालिकेने डास निर्मूलन मोहीम अधिक आक्रमक पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर आरोग्य विभाग व मुंबई महापालिकेकडून नागरिकांनीही योग्य तीकाळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. ताप, अंगदुखी, उलट्या यांसारखी लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही आवाहन महापालिकेने केले आहे.


पावसाच्या लवकर आगमनामुळे शहरात संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. डेंग्यू हा डासांद्वारे पसरणारा व्हायरल आजार आहे. याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. याचा प्रसार एडिस एजिप्टी डासांद्वारे होतो. रुग्णांना संसर्गानंतर ५-६ दिवसांत लक्षणे दिसू लागतात. लक्षणेः उच्च ताप, कपाळदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, सांधेदुखी, स्नायुदुखी, चव व भूक मंदावणे, छाती व हातपायांवर पुरळ, मळमळ, उलटी होते. एकूणच साथीच्या आजारांची काळजी घेण्याची गरज असून कोणताही लक्षणे आढळल्यास स्वतःहून औषधोपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र