जामखेडचा राज्यात डंका

महाअवास अभियान २०२२-२३ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक


जामखेड : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राबविण्यात आलेल्या महाअवास अभियान २०२२-२३ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून निवडलेल्या यशस्वी तालुक्यांमध्ये जामखेड तालुक्याची निवड ही एक गौरवाची बाब आहे.ही कामगिरी राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या श्रेणीत सर्वोत्तम मानली गेली आहे.


या यशाबद्दल लाभार्थी मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ३ जून २०२५ रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल,बालेवाडी,पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात जामखेड तालुक्याचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.कार्यक्रमास केंद्रीय ग्रामविकास व कृषिमंत्री मा.शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे,जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री मा.अजित पवार,तसेच ग्रामविकास मंत्री मा.जयकुमार गोरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



महाअवास अभियान २०२२-२३ अंतर्गत जामखेड तालुक्याने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे,ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.याआधीही २०२१-२२ मध्ये नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान जामखेडने पटकावला होता.यशाचा हा सातत्यपूर्ण प्रवास वरिष्ठ अधिकारी,सहकारी कर्मचारी, जनप्रतिनिधी, पत्रकार,ग्रामस्थ आणि लाभार्थी यांच्या सहकार्यामुळेच शक्य झाला आहे.जामखेडसारख्या अवर्षण प्रवण तालुक्याचा संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवणे ही आपल्या सर्वांचीच एक सामूहिक उपलब्धी आहे, आणि ती निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
- प्रकाश पोळ, तत्कालीन गटविकास अधिकारी

Comments
Add Comment

KERALA : मान्सून केरळच्या उंबरठ्यावर

पुढील २४ ते ४८ तासांत धडकणार, महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा 'यलो अलर्ट' पुणे : कडाक्याच्या उन्हाने हैराण

Cabinet Decision: शेतकरी कर्जमाफीचे निकष जाहीर

दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफ; ‘वन टाईम सेटलमेंट’ आणि प्रोत्साहनपर अनुदान देणार मुंबई : राज्यातील शेतकरी बांधवांना

Cabinet decision : ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधांना बूस्टर

 'मुख्यमंत्री ग्राम सडक योजने'साठी ६ हजार ४२९ कोटी; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : राज्यातील ग्रामीण संपर्क

Minister Adv. Ashish Shelar : रायगडावरील सुविधांची सामूहिक पाहणी करून व्यापक आराखडा ठरविणार

मुंबई,  : रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच रायगड विकास

Monsoon 2026 : दिलासादायक! येत्या ४८ तासांत केरळमध्ये पाऊस बरसणार; महाराष्ट्रासह 'या' राज्यांना पाऊस झोडपणार! IMD चा अंदाज काय ?

मुंबई : उन्हाच्या तीव्र झळा आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी अखेर एक दिलासादायक बातमी समोर आली

अमृता फडणवीसांनी चालवली गुलाबी ई-रिक्षा; महिलांच्या सक्षमीकरणासाठी नव्या उपक्रमाची सुरुवात

मुंबई  : जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत पर्यावरणपूरक