सौदी अरेबिया भारतात करणार अब्जावधींची गुंतवणूक

  53

नवी दिल्ली : भारत आणि सौदी अरेबियामधील संबंध आणखी दृढ होणार आहेत. मोदी सरकारने सौदी अरेबियाला भारतात अब्जावधींची गुंतवणूक करणे शक्य व्हावे यासाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. यामुळे सौदी अरेबियाला भारतात अधिक गुंतवणूक करता येईल. सध्या सौदी अरेबियातील कंपन्यांचे बरेच पैसे मुकेश अंबानींच्या कंपन्यांमध्येच गुंतवले जातात. पण नियमांतील बदलांमुळे सौदी अरेबियातील कंपन्या भारतात वेगवेगळ्या क्षेत्रात अब्जावधींची गुंतवणूक करू शकतील.

सध्याच्या नियमांनुसार, जर एखादी परदेशी कंपनी भारतात गुंतवणूक करते, तर तिची वेगवेगळ्या भागांमधून येणारी गुंतवणूक एकच मानली जाते. कंपनीमध्ये गुंतवणुकीची मर्यादा दहा टक्के निश्चित करण्यात आली आहे. या नियमामुळे सौदी अरेबियाच्या शाही कंपन्या भारतात भारतात जास्त गुंतवणूक करू शकत नव्हत्या. पण भारताने नियमांत केलेल्या बदलांमुळे सौदी अरेबिया भारतातील गुंतवणुकीत वाढ करू शकेल.

भारत सरकारने सौदी अरेबियाच्या पीआयएफला (Public Investment Fund or PIF is Saudi Arabia's sovereign wealth fund / पीआयएफ म्हणजे सौदी अरेबियाचा सार्वभौम संपत्ती निधी ) कठोर नियमातून वगळले आहे. पीआयएफच्या वेगवेगळ्या कंपन्या आता भारतात स्वतंत्र गुंतवणूक करू शकतील. यामुळे त्यांना भारतीय शेअर बाजारात पैसे गुंतवणे सोपे होईल.

सौदी अरेबियाकडे भरपूर पैसा आहे आणि भारताला विकासासाठी तो पैसा हवा आहे. सौदी अरेबियाला भारतासारख्या आर्थिकदृष्ट्या वेगाने वाढणाऱ्या देशांमध्ये गुंतवणूक करायची आहे. 'व्हिजन २०३०' अंतर्गत सौदी अरेबियाला आपल्या अर्थव्यवस्थेला तेलावरील अवलंबित्वापासून मुक्त करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिलमध्ये सौदी अरेबियाला भेट दिली. या भेटीवेळी दोन्ही देशांनी ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि औषध यासारख्या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर सहमती दर्शवली होती. भारत आणि सौदी अरेबिया द्विपक्षीय गुंतवणूक करार (BIT) वर देखील वाटाघाटी करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाकडे ९२५ अब्ज अमेरिकन डॉलर एवढा सार्वभौम संपत्ती निधी आहे. सध्या पीआयएफने भारतात मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये दिड अब्ज अमेरिकन डॉलर आणि रिलायन्स रिटेलमध्ये १.३ अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवले आहेत.

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे. त्याला तेलाने समृद्ध आखाती देशांकडून दीर्घकालीन गुंतवणूक हवी आहे. त्याच वेळी, सौदी अरेबियाला त्यांच्या 'व्हिजन २०३०' योजनेअंतर्गत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक वाढवायची आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, दोन्ही देशांनी २०२४ मध्ये एक उच्चस्तरीय कार्यदलांची स्थापना केली आहे. सौदी भारतात १०० अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवण्याचे नियोजन करत आहे. या गुंतवणुकीला भारत सरकार करसवलत देणार आहे. यामुळे भारताच्या पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रांना मदत होईल.
Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

प्रहार शनिवार विशेष: 'पलीकडे परतफेड' (Beyond Dreams)- उद्दिष्टे साध्य करण्यासाठी म्युचल फंड कसे विकसित होत आहेत? -रवी कुमार झा, एलआयसी म्युचल फंड

लेखक- रवी कुमार झा, एलआयसी म्युचल फंडचे एमडी आणि सीईओ म्युचल फंड वैयक्तिक आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम प्रोफाइल (Risk

Eight Pay Commision: सरकारी कर्मचाऱ्यांना खुषखबर ! आठवे वेतन १ जानेवारीपासून एकूण पगारात 'इतकी' वाढ !

प्रतिनिधी: सरकारी कर्मचाऱ्यांना खुषखबर आहे. अखेर आठव्या पे कमिशन (8th Pay Communication) मध्ये किती पगारवाढ होऊ शकते त्यांचे

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे