देशात ३९७६ सक्रिय कोरोना रुग्ण

२४ तासांत २०३ नवे रुग्ण तर चौघांचा मृत्यू


नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढल्याचे चित्र आहे. भारतात कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ३९७६ झाली आहे. आरोग्य विभागाच्या वेबसाइटनुसार, गेल्या १० दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत १५ पटींनी वाढ झाली आहे. केरळमध्ये सर्वाधिक १४३५ रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र ५०६ रुग्णांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच यावर्षी संसर्गामुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या ३४ झाली आहे.


आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते, मागील दिवसाच्या तुलनेत सक्रिय रुग्णांच्या संख्येत २०३ ची वाढ झाली आहे. यापूर्वी केंद्रीय आरोग्य आणि आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी आश्वासन दिले होते की, केंद्र कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.आमचा केंद्रीय आरोग्य विभाग आणि आयुष मंत्रालय पूर्णपणे सतर्क आहे आणि सर्व राज्यांमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आरोग्य आणि आयुष सचिव तसेच इतर संबंधित मंत्र्यांशी बोललो आहोत. मागील कोविड-१९ लाटेदरम्यान विकसित केलेल्या पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला आहे. सरकार कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी सुरू आहे.



गेल्या चोवीस तासांत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमध्ये सोमवारी १८ वर्षीय गर्भवती मुलगी आणि एका ४७ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यापूर्वी रविवारी दिल्लीत २२ वर्षीय मुलगी आणि तामिळनाडूमध्ये २५ वर्षीय मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.सतत वाढणाऱ्या रुग्णांमुळे, सरकारने एक सार्वजनिक सुचना जारी केली आहे. यामध्ये गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचे, शारीरिक अंतर राखण्याचे आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ताप, खोकला, छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, तत्काळ चाचणी करण्यास सांगितले आहे.

Comments
Add Comment

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन