Pune Accident : पुण्यात दारूच्या नशेत, एमपीएससीच्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारची धडक

पुणे : शनिवारी संध्याकाळी सदाशिव पेठेतील भावे हायस्कूल परिसर रक्तबंबाळ झाला. एका मद्यधुंद कारचालकाने चहा पित असलेल्या १२ एमपीएससी विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले. अरुंद रस्त्यांमध्ये अचानक घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


या धडकेत तिघांची प्रकृती गंभीर असून उर्वरित नऊ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. सगळ्यांवर सध्या संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांपैकी काही रविवारी होणा-या एमपीएससी परीक्षेला बसणार होते. पण आता त्यांचं भविष्य हॉस्पिटलच्या बेडवर थांबले आहे.


या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. फुटेजनुसार, मद्यधुंद अवस्थेत असलेला चालक रस्त्यावरील नियंत्रण हरपून थेट विद्यार्थ्यांच्या गर्दीत बेदरकारपणे घुसला. या विद्यार्थ्यांमध्ये तीन मुलींचाही समावेश आहे.



अपघात होताच परिसरात एकच गोंधळ उडाला. रक्ताच्या थारोळ्यात मित्रांचे आवाज, मदतीचे आर्त साद आणि धावपळ सुरू झाली. पोलिसांनी तत्काळ कारचालकाला अटक केली असून त्याच्यावर दारूच्या नशेत गाडी चालवण्याचा गुन्हा दाखल केला आहे.


घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आमदार हेमंत रासणे घटनास्थळी दाखल झाले. रासणे यांनी त्वरित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सर्व जखमींवर तत्काळ आणि मोफत उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.


या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत आता शासनाकडून विशेष निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि “आवश्यक ती मदत सरकार देईल,” असे आश्वासन दिले.


दरम्यान, या दुर्घटनेने पुन्हा एकदा मद्यधुंद वाहनचालकांविरोधात कठोर कारवाईची गरज अधोरेखित केली आहे. चहा प्यायला जमलेले निरागस विद्यार्थी दारूच्या नशेत गाडी चालवणा-या एका बेजबाबदार व्यक्तीच्या चुकीचा बळी ठरले. आता पाहावे लागेल की या विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सरकार काय विशेष पाऊलं उचलते.

Comments
Add Comment

Wipro Office Religious Harassment : TCS नंतर आता विप्रोही वादाच्या भोवऱ्यात? धर्म बदलण्यास नकार दिल्याने नोकरी गमवावी लागली; पुण्यातील माजी कर्मचारीचा गंभीर आरोप

पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी

Shrirampur ATS Raid : पाकिस्तानी गँगस्टरच्या सोशल मीडिया नेटवर्कचा महाराष्ट्रात शिरकाव? श्रीरामपूरमध्ये ATS ची मोठी कारवाई, चार जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत चार संशयितांना

Minister Makarand Jadhav-Patil : राज्यात नवे पुनर्वसन धोरण येणार

मंत्री मकरंद जाधव-पाटील; कालानुरूप सर्व बदल समाविष्ट करणार मुंबई : राज्यातील दरडप्रवण गावांचे कायमस्वरूपी

HSRP Number Plates : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! ३० जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; अन्यथा कारवाईची शक्यता

राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत सर्व शासकीय आणि

Shivrajyabhishek Sohala : शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी शिवभक्तांसाठी विशेष बससेवा सुरू; आता दादरहून थेट सांदोशीपर्यंत प्रवास करता येणार

रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी दिलासादायक बातमी समोर आली

Raigad Crime : सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेचे अपहरण करून खून; दोघांना अटक

रायगड : सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी एका महिलेचे अपहरण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मांडवा