राज्यात शिक्षकेतर भरतीला तूर्तास स्थगिती – आधी समायोजन, नंतर निर्णय

  42

अमरावती : राज्यातील शालेय शिक्षण विभागाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी ४ एप्रिल २०२५ रोजी आदेश काढला होता. त्यामुळे अनेक शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर भरती होईल अशी अपेक्षा होती. पण आता ही भरती प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे.


माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी २८ मे रोजी स्पष्ट निर्देश दिले की, सध्या कोणतीही नवीन शिक्षकेतर भरती केली जाणार नाही. आधी राज्यभरातील अतिरिक्त पदांचे समायोजन पूर्ण केले जाईल, त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.


राज्यातील अनेक मान्यता प्राप्त, अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक यांसारख्या शिक्षकेतर पदांच्या भरतीची मागणी गेल्या काही काळापासून सुरू होती. ४ एप्रिल रोजी शासनाने यासाठी मंजुरी देत सुधारित आकृतीबंध लागू केला होता. यामुळे शिक्षण संस्था भरतीबाबत उत्सुक होत्या.


पण आता शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली २७ मे रोजी झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आलं की, २०२३-२४ च्या संच मान्यता दिल्या गेल्या असून २०२४-२५ च्या मान्यता प्रक्रियेसाठी NIC वर काम सुरू आहे. यानंतरच मंजूर, रिक्त व अतिरिक्त पदांची स्थिती लक्षात घेऊन समायोजन केलं जाईल.


सरकारकडून स्पष्ट आदेश येईपर्यंत कोणतीही भरती किंवा लाभ देऊ नयेत, असंही डॉ. पालकर यांनी सांगितलं आहे. तसेच, जर भरती केली गेली तर संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या