राज्यात शिक्षकेतर भरतीला तूर्तास स्थगिती – आधी समायोजन, नंतर निर्णय

  60

अमरावती : राज्यातील शालेय शिक्षण विभागाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी ४ एप्रिल २०२५ रोजी आदेश काढला होता. त्यामुळे अनेक शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर भरती होईल अशी अपेक्षा होती. पण आता ही भरती प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे.


माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी २८ मे रोजी स्पष्ट निर्देश दिले की, सध्या कोणतीही नवीन शिक्षकेतर भरती केली जाणार नाही. आधी राज्यभरातील अतिरिक्त पदांचे समायोजन पूर्ण केले जाईल, त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.


राज्यातील अनेक मान्यता प्राप्त, अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक यांसारख्या शिक्षकेतर पदांच्या भरतीची मागणी गेल्या काही काळापासून सुरू होती. ४ एप्रिल रोजी शासनाने यासाठी मंजुरी देत सुधारित आकृतीबंध लागू केला होता. यामुळे शिक्षण संस्था भरतीबाबत उत्सुक होत्या.


पण आता शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली २७ मे रोजी झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आलं की, २०२३-२४ च्या संच मान्यता दिल्या गेल्या असून २०२४-२५ च्या मान्यता प्रक्रियेसाठी NIC वर काम सुरू आहे. यानंतरच मंजूर, रिक्त व अतिरिक्त पदांची स्थिती लक्षात घेऊन समायोजन केलं जाईल.


सरकारकडून स्पष्ट आदेश येईपर्यंत कोणतीही भरती किंवा लाभ देऊ नयेत, असंही डॉ. पालकर यांनी सांगितलं आहे. तसेच, जर भरती केली गेली तर संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत