राज्यात शिक्षकेतर भरतीला तूर्तास स्थगिती – आधी समायोजन, नंतर निर्णय

अमरावती : राज्यातील शालेय शिक्षण विभागाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी ४ एप्रिल २०२५ रोजी आदेश काढला होता. त्यामुळे अनेक शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर भरती होईल अशी अपेक्षा होती. पण आता ही भरती प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे.


माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी २८ मे रोजी स्पष्ट निर्देश दिले की, सध्या कोणतीही नवीन शिक्षकेतर भरती केली जाणार नाही. आधी राज्यभरातील अतिरिक्त पदांचे समायोजन पूर्ण केले जाईल, त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.


राज्यातील अनेक मान्यता प्राप्त, अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक यांसारख्या शिक्षकेतर पदांच्या भरतीची मागणी गेल्या काही काळापासून सुरू होती. ४ एप्रिल रोजी शासनाने यासाठी मंजुरी देत सुधारित आकृतीबंध लागू केला होता. यामुळे शिक्षण संस्था भरतीबाबत उत्सुक होत्या.


पण आता शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली २७ मे रोजी झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आलं की, २०२३-२४ च्या संच मान्यता दिल्या गेल्या असून २०२४-२५ च्या मान्यता प्रक्रियेसाठी NIC वर काम सुरू आहे. यानंतरच मंजूर, रिक्त व अतिरिक्त पदांची स्थिती लक्षात घेऊन समायोजन केलं जाईल.


सरकारकडून स्पष्ट आदेश येईपर्यंत कोणतीही भरती किंवा लाभ देऊ नयेत, असंही डॉ. पालकर यांनी सांगितलं आहे. तसेच, जर भरती केली गेली तर संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात