पुण्यात आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुणे : कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या मदतीनं नाविण्यपूर्ण परिवर्तन घडविण्यासाठी पुण्यात पहिली आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन होत आहे. १ ते ३ जून या कालावधीत होणाऱ्या कृषी हॅकेथॉनमध्ये युवा संशोधक, स्टार्टअप्स, कृषितज्ज्ञ आणि शेतकरी बांधवांना एकत्र आणलं जाईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न होईल. विशेष म्हणजे खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या, संस्थांच्या मदतीनं शासनस्तरावर हे प्रयत्न होत आहेत. चला जाणून घेऊ या अधिक माहिती..



राज्य कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पुण्यातील कृषी महाविद्यालय यांच्या सहकार्याने कृषी हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आलंय. कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी तांत्रिक सहाय्य घेण्याबरोबरच खते, पाणी यांचा वापर कमी करण्यावर भर देण्यात येणारेय. या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पादन कसं वाढेल, याचं मंथन या तीन दिवसात केलं जाईल.या उपक्रमात सुमारे दोन हजार शेतकरी आणि विद्यार्थ्यांना आमंत्रित केलंय.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितल की, पुण्यातील कृषी महाविद्यालयात होणाऱ्या या ‘कृषी हॅकेथॉन’चं १ जून २०२५ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन होईल. ३ जून रोजी समारोप होणार असून यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, कृषिमंत्री डॉ. माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार आहेत.

हॅकेथॉनमध्ये सव्वातीन कोटी रुपयांची पारितोषिके दिली जाणारआहेत. विजेत्यांना विषयवार रोख परितोषिकं तसेच अग्रगण्य कृषी स्टार्टअप इनक्युबेटरकडून प्राधान्यानं इन्क्युबेशन व निधी साह्य दिले जाणार आहे. या उपक्रमात आतापर्यंत एक हजार 800 जणांनी सहभाग नोंदवलाय. त्यातून ५६० जणांनी त्यांचं प्रेझेंटेशन दिलंय. त्यापैकी १४० जणांची निवड झालीय. यापैकी आठ गटांत प्रत्येकी दोघांची पुरस्कारासाठी निवड होणार आहे. या हॅकेथॉन स्पर्धेत आठ क्षेत्रांतील विजेत्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये, तर द्वितीय विजेत्याला प्रत्येकी पंधरा लाख रुपये देण्यात येतील. हॅकेथॉनमध्ये एआयचा वापर करून शेतीचं सक्षमीकरण कसं करायचं या बद्दलची प्रकल्प देखिल सादर होणार आहेत.

लहान व अल्पभूधारक शेतक-यांसाठी कमी खर्चीक, सोपे व परिणामकारक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल जाईल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय), डेटा अॅनालिटिक्स यांचा शेतीमध्ये वापर करणे, हवामान बदल, पाणीटंचाई यांसारख्या दीर्घकालीन समस्यांवर उपाय शोधण्याचा या मागचा उद्देश असणार आहे.
Comments
Add Comment

Nitesh Rane : मोरा मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले

लग्न जमेना म्हणून तरुणाची भन्नाट कल्पना, थेट बॅनरवर पठ्ठ्याने लिहिलं असं काही की तुम्हांलाही ऐकून धक्का बसेल

पुणे : लग्न जमत नाही म्हणून अनेक तरुण सध्या नैराश्यात दिसत आहे. मुलीच्या तसेच वडिलांच्या एकंदरीतच

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Santosh Deshmukh : 'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव'..., मस्साजोगच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा खळबळजनक आरोप

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले

Pune Water Supply : पुण्याच्या पाणीकपातीवर प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय

पुणे : सूर्याचा प्रकोप हा वाढत जातोय, तापमानाचा पारा इतका वाढलाय की थेट तापमान ४०- ४५ अंशापर्यत जाऊन पोहोचलाय,

Free Registration For Agricultural Land : राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी रद्द

मुंबई : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देत राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर