उत्तर भारतात उष्णतेची लाट, नागरिक पाहताहेत पावसाची वाट

लखनऊ : केरळमध्ये ८ दिवस आधी आणि महाराष्ट्रात तब्बल १२ दिवस आधी मान्सून बरसलाय. मात्र उत्तर भारतातील यूपी, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशातील लोकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. उष्णतेच्या लाटेने हैराण झालेले उत्तर भारतीय चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहताहेत. मग मान्सून उत्तर भारतात कधी धडकणार? उत्तर भारतीय कधी सुखावणार? चला तर जाणून घेऊयात हवामान विभागाचा ताजा अंदाज.


यंदा मान्सूनने सर्वांनाच चकित केलंय. २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झालेला पाऊस अवघ्या सहा दिवसांत अन्य १७ राज्यांमध्ये पोहोचला. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, ओडिशा, छत्तीसगड आणि ईशान्य भारतातील त्रिपुरा, मणिपूर, मिझोरम, मेघालय, आसाम, सिक्कीम या राज्यांमध्ये मान्सून सक्रिय झालाय. यंदा आतापर्यंत ३३ टक्के जास्त पाऊस झालाय, मात्र आता बंगालच्या उपसागरातील झालेल्या बदलामुळे मान्सूनचा वेग मंदावल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

दुसरीकडे उत्तर भारतात अद्याप उष्णतेची लाट आहे. त्यामुळे उत्तर भारतीय उकाड्याने हैराण झाले आहेत. आहे. यूपी, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशात नागरिक पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहात आहेत. आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. कधी एकदा पाऊस बरसतोय याची आतुरता वाढलीय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात झालेल्या बदलामुळे उत्तर भारतात मान्सून सात ते दहा दिवस उशिराने येण्याची शक्यता आहे.


 

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये दहा जूनच्या सुमारास मान्सून येण्याची शक्यता आहे. झारखंड आणि बिहारच्या अनेक भागात १५ जूनपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः गोड्डा आणि पाकुड येथे गेल्या गुरुवारी झालेल्या पावसाने याची झलक दाखवली आहे. तर मध्य प्रदेशात १५ ते २० जून दरम्यान जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात २० ते २५ जून दरम्यान पाऊस दाखल होईल, असा अंदाज आहे. यावेळी जम्मू-काश्मीरमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. दिल्ली-एनसीआर, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागात २५ ते ३० जून दरम्यान मान्सून बरसण्याची शक्यता आहे. तर राजस्थानात जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये १ आणि २ जूनला प्रतिसात ५० - ६० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मान्सूनच्या आगमनाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, मात्र पावसाला उशीर होत असल्याने काही प्रमाणात चिंताही वाढलीय. यूपी, बिहार, आणि मध्य प्रदेशातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कारण यंदा जून ते सप्टेंबरदरम्यान 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. मान्सूनचा पाऊस उत्तर भारतात थोडा उशिरा येत असला, तरी त्याचं स्वागत करण्यासाठी उत्तर भारतीयांनी सज्ज असायला हवं. यूपी, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि दिल्लीत लवकरच पावसाच्या सरी बरसणार आहेत.
Comments
Add Comment

रेल्वेचा नवीन नियम लागू; आता खिडकीवर तिकीट खरेदी करताना सुद्धा लागणार 'ओटीपी'

मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या

धक्कादायक! सौंदर्याच्या ईर्ष्येतून तरुणीने केली चार लहानग्यांची हत्या, विकृत मानसिकतेमुळे पोटच्या मुलीचाही केला नाही विचार

पानीपत: हरियाणातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.या प्रकरणात एका महिलेने केलेली कृती ऐकताच जगात किती

छत्तीसगडच्या बस्तर भागात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक! १५ नक्षलवादी ठार तर ३ जवान शहीद

छत्तीसगड: छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर विभागातील बीजापूर-दंतेवाडा सीमेवर भारतीय सुरक्षा दल आणि

Barmati Couple Car Accident Tirupati : तिरुपती दर्शनाहून परतणाऱ्यांवर दु:खाचा डोंगर! बारामतीमधील दांपत्याच्या कारला ट्रक धडकला अन्...

बारामती : गेल्या काही दिवसांत देवदर्शनासाठी निघालेल्या किंवा परतणाऱ्या भाविकांच्या अपघाताच्या दुर्दैवी घटना

महाराष्ट्राचे सुपुत्र वेदमूर्ती देवव्रत रेखेंना 'दण्डक्रम विक्रमादित्य' ही मानाच्या पदवी पात्र! पंतप्रधानांनी केले कौतुक

वाराणसी: अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी २०० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. दोन

Woman Injured : पाणीपुरीमुळे जबडा अडकला अन् थेट निखळला; डॉक्टरांनाही करावी लागली शस्त्रक्रिया, 'ही' बातमी वाचून तुम्हीही थबकाल!

दिबियापूर : पाणीपुरी हे सर्वांचेच आवडते खाद्य आहे, विशेषतः महिलांसाठी तो एक 'विक पॉईंट' असतो. पाणीपुरीच्या गाडीवर