ऐतिहासिक : NDA मधून एकाचवेळी १७ मुली सैन्यात दाखल

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएमध्ये शुक्रवारी इतिहास घडला. अधिकारी म्हणून सैन्यदलात दाखल होणाऱ्या पहिल्या महिला बॅचच्या सतरा कॅडेट्स एनडीएतून खडतर प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या. या काळात जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अनेक शारीरिक, मानसिक आव्हानांना सामोरे गेल्या. एनडीएतील हा दीक्षांत समारंभ म्हणजे अवघ्या भारतासाठी हा क्षण अभिमानाचा होता. विशेष म्हणजे ७५ वर्षांचा इतिहासात प्रथमच मुला- मुलींचे दीक्षांत संचलन एकत्रित पार पडले.



सर्वोच्च न्यायालयाने २०२१ मध्ये दिलेल्या निकालानंतर मुलींसाठी एनडीएचे दरवाजे पंचाहत्तर वर्षांनी प्रथमच खुले झाले. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत प्रवेश प्रक्रिया राबवत देशभरातून १९ मुलींची पहिल्या तुकडीसाठी निवड करण्यात आली. यातील १७ कॅडेट्सनी तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. एकूण ३३९ कॅडेट पदवी घेऊन लष्कर, नौदल आणि हवाईदलात थेट अधिकारीपदावर नियुक्त होणार आहेत.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने गुरुवारी पदवी प्रदान केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुण्यातील एनडीएच्या मैदानावर मिझोरामचे राज्यपाल तथा निवृत्त जनरल डॉ. व्ही. के. सिंग यांच्या उपस्थित १४८ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा पार पडला. ऐतिहासिक पासिंग आउट परेडमध्ये मुली व मुलांनी पथसंचलन केले. मुलांच्या बरोबरीने या मुलींनी खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. या परेडमध्येही मुलांच्या इतकाच जोश, ताकद अन् उत्साह मुलींमध्ये दिसला. हा प्रसंग अनुभवताना मुलींच्या आई-वडिलांसह प्रत्येकांचा उर देशाभिमाने भरून आला. मुलींच्या पहिल्या तुकडीचा कॅडेट असल्याचा अभिमान वाटतो,. आई - वडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना मुलींनी यावेळी व्यक्त केली. या सोहळ्याला लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख ले. जनरल धीरज सेठ, एनडीएचे प्रमुख व्हाॅइस अ‍ॅडमिरल गुरचरण सिंग, उपप्रमुख एअर मार्शल सरताज बेदी उपस्थित होते.

एकाच ठिकाणी लष्कर, नौदल आणि हवाईदलाचे अधिकारी तयार करता यावेत या उद्देशानं एनडीएची स्थापना पुण्यातील खडकवासला इथं 8 जून 1949 ला झाली. त्यानंतर त्यानंतर ७५ वर्षांनंतर सर्व मुली तीन वर्षांचे खडतर परिश्रम पूर्ण करीत आज देशाच्या सैन्यदलात अधिकारीपदावर रुजू होण्यास सज्ज झाल्या. एनडीएमध्ये प्रवेश मिळवण्यापासून ते येथील तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण . या आव्हानांना सामोरे जात सगळ्या जणींनी यशाला गवसणी घातलीय. यशाने पुढे जाण्याचा नवा आत्मविश्वास मिळाला आहे. आम्ही सर्व जणींनी तीन वर्षे एकत्रित प्रशिक्षण घेतले. आम्ही सर्व जणींनी एकमेकांना प्रोत्साहित केले. आम्ही सगळ्या जणी बहिणी आहोत. प्रत्येकीने यशाचे शिखर गाठल्याचा आनंद आहे. मी पुढे नौदलात जाणार आहे, अशी प्रतिक्रिया हरसिमरन कौर हिनं व्यक्त केली.
Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा