रायगड जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई

जिल्हा परिषदेकडून टँकरने पुरवठा बंद


नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ


अलिबाग : मे महिन्यात आतापर्यंतचा सर्वाधिक मुसळधार पाऊस पडलेला असला, तरी रायगड जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांना आजही पिण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार, शनिवारी (दि. २४) ४३ गावे आणि २४२ वाड्यांमधील एकूण एक लाख १३ हजार नागरिकांना पाणीटंचाई जाणवत होती. यासाठी प्रशासनाकडून ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता; मात्र मुसळधार पावसात सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत.


पाणी वाहून गेल्याने नैसर्गिक पाणवठे पाऊस थांबताच कोरडे पडतात, तर ज्या पाणवठ्यांमध्ये पाणी आहे, ते पिण्यायोग्य नसल्याने ६० टक्के टंचाईग्रस्त गावे अद्याप तहानलेलीच आहेत. त्यामुळे पिण्यासाठी जारद्वारे विकतचे पाणी घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. दरवर्षी पावसाला सुरू झाल्यावरही टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यंदा मे महिन्यात झालेल्या पावसाने नागरिकांना काहीसा दिलासा दिला; मात्र हे पाणी वाहून गेल्याने टंचाईग्रस्त गावांना पुन्हा टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पाऊस सुरू होताच जिल्हा परिषदेने टँकर बंद करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना पदरमोड करून जारमधील पाणी विकत घ्यावे लागत आहे.


पेण तालुक्यातील शिर्कीचाळ, दादर, रावे गावांत, अलिबाग तालुक्यातील मिळकतखार, सारळ या समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांची टंचाई कायम असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सर्वाधिक पाणीटंचाई महाड तालुक्यात जाणवत आहे. मे महिन्यात येथील बहुतांश पाणवठे आटले असून, जलजीवनच्या योजनाही कुचकामी ठरल्या आहेत. शनिवारपर्यंत महाड तालुक्यात ११ गावे आणि ११६ वाड्यांना, तर पनवेलमध्ये चार गावे आणि १४ वाड्यांना टंचाई जाणवत होती.


जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई आराखड्यानुसार ज्या गावातून किंवा लोकवस्तीतून पाण्याच्या टँकरची मागणी होईल, त्याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सुचना आहेत; मात्र सध्या पडत असलेल्या पावसात दुर्गम भागात टँकर जाऊ शकत नाहीत.


काही ठिकाणी चिखल झाल्याने टँकर घेऊन जाण्यास चालक तयार नाहीत, तर बहुतांश ठिकाणचे जलस्रोत अद्याप गढूळ आहेत. काही टँकरचालकांना शुद्ध पाणी कोणत्या जलस्रोतातून भरायचा असा प्रश्न पडत आहे. रायगड जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये पाणीटंचाई नियंत्रणात आहे. सुधागड, पाली, रोहा, म्हसळा, मुरूड, तळा या तालुक्यांमध्ये आजघडीला एकही गाव किंवा वाडी टंचाईग्रस्त नाही, असा अहवाल जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेला आहे, तर यापूर्वी टँकरमुक्त तालुका म्हणून उल्लेख केला जात असलेल्या अलिबाग तालुक्यातही दोन टँकरने पाणीपुरवठा करावा लागला आहे.



बाटलीबंद पाण्याला अधिक पसंती


पावसातील गढूळ, दूषित पाण्यामुळे आजार होऊ शकतात. यामुळे डॉक्टरांकडून पाणी गरम करून पिण्याचा सल्ला दिला जात आहे; परंतू प्रवासात पाणी गरम करणे शक्य नसल्याने नागरिकांकडून बाटलीबंद पाण्याला अधिक पसंती दिली जात आहे. स्वयंपाक किंवा कुटुंबीयांना पिण्यासाठी बाटलीबंद पाणी परवडणारे नसते, यामुळे नाईलाजास्तव जारमधील पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे जारमधून पाणी विकणाऱ्यांच्या धंद्यात तेजी आहे. पूर्वी एका जारसाठी १०० रुपये डिपॉझिट आणि प्रत्येक रिफिलसाठी ४० रुपये द्यावे लागायचे आता ते ५० रुपये करण्यात आले आहे.


सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुढील अनेक दिवसांचा पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करणे थांबवले आहे; जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी बोलूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या असेल त्या गावांत पुन्हा टँकर पुरवठा करण्यात येईल.
- संजय वेंगुर्लेकर, (कार्यकारी अभियंता, रायगड जिल्हा परिषद)


Comments
Add Comment

Eknath Shinde : रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईक स्वाराला दिला मदतीचा हात

विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात केले दाखल रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३

Eknath Shinde: रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा मुंबई :

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक

Ashish Shelar : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या

मुंबई,: रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.