National Highway Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात, तिघांचा मृत्यू तर दोन जखमी

  32

मुंबई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाडा खडकोना परिसरात आज, शनिवारी एक गाव प्रवासी वाहनाला झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मेंढवण खिंडीच्या उतारावर सकाळी ११.३० वाजता मनोर गेट हॉटेल समोर हा अपघात झाला. यामध्ये ग्लोरिया वेल्स (वय ७३), क्लेटन वेल्स (वय ४३) आणि फॅबीओला वेल्स (वय ४५) यांचा मृत्यू झाला. तर हेनान वेल्स (वय ६३) आणि रेडन वेल्स (वय ९) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




यासंदर्भातील माहितीनुसार आज, शनिवारी सकाळी ११.३० वाजता डस्टर कार मुंबईच्या दिशेने जात होती. त्यावेळी मेंढवन खिंडीच्या उतारावर मनोर गेट हॉटेल समोर काँक्रीटच्या रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरु होते. त्यामुळे एक मार्गिका बंद करण्यात आली होती. समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने अचानक आपत्कालीन ब्रेक दाबला. त्यामुळे भरधाव वेगाने आलेल्या डस्टर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि समोरच्या वाहनाला जाऊन धडकली. त्याचवेळी कारच्या पाठिमागून भरधाव वेगाने आलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या बल्कर ट्रकने डस्टर कारला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की कारचा चेदामेंदा झाला. अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मनोर मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनोर पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.

Comments
Add Comment

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये