‘नीट-पीजी’ची आता एकाच शिफ्टमध्ये परीक्षा

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय


नवी दिल्ली :सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. ३०) नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनला नीट-पीजी परीक्षा २०२५ परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाने एनबीईचा नीट-पीजी परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्याचा निर्णय फेटाळून लावला. कारण अशा पद्धतीच्या परीक्षेमुळे मनमानी होईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.



नीट-पीजी परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्याच्या एनबीईच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकांवरील सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.


एकाच शिफ्टमध्ये परीक्षा आयोजित करण्यासाठी पुरेशी केंद्रे नसल्याचा एनबीईचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. ही परीक्षा केवळ एका शहरात नाही, तर संपूर्ण देशभरात घेतली जात आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने याआधी निर्देश जारी केले होते. प्रवेशासाठी समुपदेशन करण्यापूर्वी महाविद्यालयांनी प्रवेश शुल्क जाहीर करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या