‘नीट-पीजी’ची आता एकाच शिफ्टमध्ये परीक्षा

  41

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय


नवी दिल्ली :सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. ३०) नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनला नीट-पीजी परीक्षा २०२५ परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाने एनबीईचा नीट-पीजी परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्याचा निर्णय फेटाळून लावला. कारण अशा पद्धतीच्या परीक्षेमुळे मनमानी होईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.



नीट-पीजी परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्याच्या एनबीईच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकांवरील सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.


एकाच शिफ्टमध्ये परीक्षा आयोजित करण्यासाठी पुरेशी केंद्रे नसल्याचा एनबीईचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. ही परीक्षा केवळ एका शहरात नाही, तर संपूर्ण देशभरात घेतली जात आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने याआधी निर्देश जारी केले होते. प्रवेशासाठी समुपदेशन करण्यापूर्वी महाविद्यालयांनी प्रवेश शुल्क जाहीर करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला