एसटी वाहतूक, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा!

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या प्रशासनाला सूचना


शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दक्षता घ्या


सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० मेपासून आतापर्यंत ५३६ मिलिमीटर मान्सूनपूर्व पाऊस झाला. या मान्सूनपूर्व पावसामुळे २६ हेक्टर क्षेत्रात कृषी उत्पादनाचे नुकसान झाले आहे. जवळपास ९१ घरे व गोठ्यांचे अंशत: नुकसान झाले आहे. यामुळे १७५ शेतकरी बाधित झाले आहेत. याच काळात सर्पदंशाने एक व विजेच्या धक्क्याने एक असे दोन मृत्यू झाले आहेत. याबाबतचा आढावा माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी घेत जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी व नागरिक यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गतिमान सेवा द्यावी. आपत्तीची देय नुकसानभरपाई तातडीने द्यावी. जिल्ह्यातील नागरिकांना अशा आपत्तीच्या काळात तत्पर सेवा द्या, अशा सूचना त्यांनी दिल्या.


खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी भवनात झाली. जिल्ह्यातील अवकाळी पाऊस, आपत्तीचा काळ याबाबतचा आढावा त्यांनी घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी यावर्षी झालेले एकूण पर्जन्यमान व नुकसानभरपाईचा आढावा दिला. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे, अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी आदी उपस्थित होते.



जिल्ह्यातील एसटी बसेस सेवा सुरळीत राहावी म्हणून त्याचाही आढावा घेतला. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घ्या. याकडेही विभाग नियंत्रकांनी गांभीयाने पाहावे, अशा सूचना दिल्या. नैसर्गिक आपत्तीमध्ये वीस पुरवठा खंडित होऊ शकतो. मात्र याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असा सूचना दिल्या.



भरपाईची रक्कम तातडीने द्यावी


मान्सून पूर्व पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्याचे जे नुकसान झाले आहे, त्या बाधित शेतकऱ्यांना देय असलेली नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत. ९१ घरे, गोठे यांचे अंशत: नुकसान झाले असून जवळपास ३१ लाखांचे नुकसान झाले आहे, तर आठ कच्च्या घरांचे नुकसान झाले असून ते दीड लाखांचे आहे. त्याबाबत देय नुकसान भरपाईची रक्कम तातडीने द्या, अशा सूचनाही खासदार नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Comments
Add Comment

MSRTC : कोकणातील स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी; मालवण ते थेट अक्कलकोट नवीन एसटी बससेवा सुरू!

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने कोकणातील स्वामी समर्थ भक्तांसाठी एक अत्यंत

Nitesh Rane : कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पालकमंत्री नितेश राणेंनी घेतला चहा-भजीचा आस्वाद

मसूरे : सत्तेच्या पदांचा किंवा प्रोटोकॉलचा कोणताही अभिनिवेश न बाळगता जनतेत मिसळणे, कार्यकर्त्यांच्या

Nitesh Rane : दोन वेळा शेतकरी कर्जमुक्ती देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री;मंत्री नितेश राणेंचे वक्तव्य

कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यात प्रथमच दोन वेळा

Nitesh Rane : एआयच्या मदतीने कोकणातील शेतकरी सक्षम करणार, मत्स्यव्यावसायिकांनाही शेतकरी योजनांचा लाभ देणार

कणकवली : हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेती आणि शेतकरी अधिक सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)

Nitesh Rane : चिपी विमानतळाला जलमार्गांनी जोडणार

मंत्री नितेश राणे यांची घोषणा; १५ ऑगस्टपासून नवी मुंबई-चिपी विमानसेवा सुरू होणार मुंबई : "सिंधुदुर्ग जिल्ह्याचा

NITESH RANE : वैभववाडी नाधवडे येथील प्रस्तावित 'एमआयडीसी' आता पर्यायी जागेवर; पालकमंत्री नितेश राणे

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गामुळे होणार फायदा https://prahaar.in/2026/07/22/western-railway-railone-app-western-railway-urges-passengers-to-use-the-railone-app/ मुंबई : वैभववाडी