Pune Car Accident: पुण्यात भावे शाळेजवळ भीषण अपघात, भरधाव कारने 12 विद्यार्थ्यांना उडवलं

पुणे: पुण्यातील सदाशिव पेठेत एका भरधाव कारने १२ जणांना उडवल्याची भीषण घटना घडली आहे. जखमींमध्ये बहुतेक MPSC चे विद्यार्थी असून त्यांना रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आलं आहे. तर,  कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


अपघाताची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. क्राईम सीन सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, वाहन चालकाने तसेच कारमध्ये असलेल्या इतर सहप्रवाशांनी मद्यप्राशन केले होते का? याची पुष्टी करण्यासाठी संबंधितांचा वैद्यकीय तपास केला जात आहे.



घटनास्थळी नेमकं काय घडलं?


सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास, भवानी पेठेतील श्री नाथसाई अमृततुल्य या चहाच्या टपरीवर MPSC चे अनेक विद्यार्थी चहा घेत उभे होते. त्याचवेळी, भरधाव वेगाने एक खाजगी कार त्या मार्गाने आली, या दरम्यान वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, आणि त्याने थेट विद्यार्थ्यांवर तसेच परिसरातील काही पार्क केलेल्या दुचाकींना धडक दिली.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघात करणाऱ्या कारचा चालक जयराम मुले (वय २७, रा. बिबवेवाडी) हा कदाचित मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्यासोबत गाडीत असलेला सहप्रवासी राहुल गोसावी (वय २७) आणि गाडीचा मालक दिगंबर यादव शिंदे (वय २७) यांच्याविरोधातही तपास सुरू आहे. तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



अपघातात 12 जण जखमी


या अपघातात 12 जण जखमी झाले असून, त्यातील काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. जखमींना तातडीने संचेती रुग्णालय आणि मोडक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने, अद्याप कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही.


विद्यार्थ्यांच्या गर्दीच्या ठिकाणी झालेला हा भीषण अपघात, वाहतूक सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करतो आहे. अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेने पुणेकरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

Modi and Persian scripts : राज्यात मोडी व फारसी लिपी प्रचार-प्रसारासाठी वार्षिक पुरस्कार - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रशासकीय वारशाचे जतन करण्यासाठी राज्य शासनाने मोडी व फारसी

ShivendraRaje Bhonsle : मुंबई-गोवा महामार्गाचे 'मे' अखेरपर्यंत काम पूर्णत्वास; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे विधानपरिषदेत आश्वासन

मुंबई : दरवर्षी होळी आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या

Madhuri Misal : भटक्या श्वानांच्या उपद्रवावर राज्य सरकार मोठं पाऊल उचलणार; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची सभागृहात घोषणा

शिक्षण संस्थांच्या सुरक्षिततेसाठी 'नोडल अधिकारी' नेमणार मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या

Pravin Darekar : अभियांत्रिकीच्या 'डिस्टन्स' पदव्या अवैध; तरीही महापालिकेत पदोन्नत्या कशा? आमदार दरेकरांचा सवाल

मुंबई : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गेल्या १० वर्षांत परराज्यातील विद्यापीठांच्या पदव्यांच्या आधारे देण्यात

NCMC Smart Card : एसटीच्या 'NCMC स्मार्ट कार्ड'ला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; आठवड्याभरातच १ लाखाचा टप्पा पार!

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘NCMC स्मार्ट कार्ड’

थंडी संपताच महाराष्ट्रात जाणवू लागलाय उन्हाचा तडाखा

मुंबई : थंडी सरत आली आहे. आणि हवामानात बदल जाणवायला लागला आहे. मार्च मधल्या आल्हाददायक वातावरणात उकाडा जाणवायला