GT vs MI : आयपीएल एलिमिनेटरमध्ये कोण मारणार बाजी?

गुजरात मुंबईवर भारी पडणार का?


आयपीएल २०२५च्या पहिला फायनल संघ ठरला आहे. तब्बल ९ वर्षांनी आरसीबीच्या संघाने आयपीएलची फायनल गाठली आहे. आता स्पर्धा आहे ती दुसरा फायनलिस्ट मिळवण्याची. या दुसऱ्या फायनलिस्टसाठी तीन संघांमध्ये चुरस रंगणार आहे. स्थान आहे एक आणि दावेदार आहेत तिघे. कोण मारणार बाजी? दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाबविरुद्ध कोण खेळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत.



आयपीएल २०२५मधील एलिमिनेटरचा सामना आज रंगत आहे. यासाठी आमनेसामने आहेत गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स. एकीकडे विजयाचे सातत्य असलेला गुजरात टायटन्सचा संघ तर दुसरीकडे सुरूवातीच्या पराभवातून वर आलेला मुंबई इंडियन्सचा संघ. हे दोन्ही संघ पंजाबविरुद्धच्या लढतीत खेळण्यासाठी उत्सुक आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सच्या संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे.


गुजरात टायटन्सने १४ सामन्यांपैकी ९ मध्ये विजय मिळवला आहे. तर ५ सामन्यांत पराभव सहन करावा लागला. दुसरीकडे तितकेच सामने खेळलेल्या मुंबईने ८ सामन्यांत विजय मिळवला आहे तर ६ सामन्यांत पराभव सहन करावा लागला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये गुजरातचे १८ गुण आहेत तर मुंबई इंडियन्सचे १६ गुण आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईच्या संघाने हंगामाची सुरूवात खराब केली होती. मात्र नंतर त्यांनी विजयी लय पकडली आणि ते प्लेऑफमध्ये पोहोचले.



मुंबईची फलंदाजी उत्तम आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या चांगली फलंदाजी करतायत. मात्र गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांनी चांगला खेळ करणे गरजेचे आहे. सूर्याकडून पुन्हा मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. गुजरात टायटन्सचे या स्पर्धेतील हे चौथे वर्ष आहे. त्यापैकी केवळ गेल्याच वर्षीच्या हंगामात त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. आयपीएलमध्ये हेड टू हेड पाहिले तर गुजरातने या स्पर्धेत आपला दबदबा कायम राखला आहे. त्यामुळे या एलिमिनेटरमध्ये कोण बाजी मारणार हे सामन्यानंतरच कळेल.

Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे