GT vs MI : आयपीएल एलिमिनेटरमध्ये कोण मारणार बाजी?

गुजरात मुंबईवर भारी पडणार का?


आयपीएल २०२५च्या पहिला फायनल संघ ठरला आहे. तब्बल ९ वर्षांनी आरसीबीच्या संघाने आयपीएलची फायनल गाठली आहे. आता स्पर्धा आहे ती दुसरा फायनलिस्ट मिळवण्याची. या दुसऱ्या फायनलिस्टसाठी तीन संघांमध्ये चुरस रंगणार आहे. स्थान आहे एक आणि दावेदार आहेत तिघे. कोण मारणार बाजी? दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाबविरुद्ध कोण खेळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत.



आयपीएल २०२५मधील एलिमिनेटरचा सामना आज रंगत आहे. यासाठी आमनेसामने आहेत गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स. एकीकडे विजयाचे सातत्य असलेला गुजरात टायटन्सचा संघ तर दुसरीकडे सुरूवातीच्या पराभवातून वर आलेला मुंबई इंडियन्सचा संघ. हे दोन्ही संघ पंजाबविरुद्धच्या लढतीत खेळण्यासाठी उत्सुक आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सच्या संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे.


गुजरात टायटन्सने १४ सामन्यांपैकी ९ मध्ये विजय मिळवला आहे. तर ५ सामन्यांत पराभव सहन करावा लागला. दुसरीकडे तितकेच सामने खेळलेल्या मुंबईने ८ सामन्यांत विजय मिळवला आहे तर ६ सामन्यांत पराभव सहन करावा लागला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये गुजरातचे १८ गुण आहेत तर मुंबई इंडियन्सचे १६ गुण आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईच्या संघाने हंगामाची सुरूवात खराब केली होती. मात्र नंतर त्यांनी विजयी लय पकडली आणि ते प्लेऑफमध्ये पोहोचले.



मुंबईची फलंदाजी उत्तम आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या चांगली फलंदाजी करतायत. मात्र गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांनी चांगला खेळ करणे गरजेचे आहे. सूर्याकडून पुन्हा मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. गुजरात टायटन्सचे या स्पर्धेतील हे चौथे वर्ष आहे. त्यापैकी केवळ गेल्याच वर्षीच्या हंगामात त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. आयपीएलमध्ये हेड टू हेड पाहिले तर गुजरातने या स्पर्धेत आपला दबदबा कायम राखला आहे. त्यामुळे या एलिमिनेटरमध्ये कोण बाजी मारणार हे सामन्यानंतरच कळेल.

Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घ्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व

कचऱ्यात आढळले मृत नवजात अर्भक

डहाणू (वार्ताहर) : डहाणू तालुक्यातील साखरे येथील आश्रमशाळेजवळ बुधवारी पहाटेच्या सुमारास नवजात अर्भक मृतावस्थेत

कोण करणार मराठी बिग बॉस ६ सीझनला होस्ट? सलमान खानने दिली माहिती

मुंबई : हिंदी बिग बॉस संपण्याआधीच सलमान खानने मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनला कोण होस्ट करणार याची माहिती दिली.