स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार मालिकेत काम

'क्योंकि सास भी कभी बहू थी' सिझन-२'ची घोषणा


मुंबई :'क्योंकि सास भी कभी बहू थी'च्या सीझन २ ची घोषणा झाली आहे. या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच शोचे कास्टसंदर्भात चाहते अत्यंत उत्सूक आहेत. तुलसी म्हणजेच स्मृती ईराणी आणि अभिनेता अमर उपाध्याय शोमध्ये पुन्हा येणार, अशी चर्चा होती. मात्र आता, स्मृती ईराणी झेड प्लस सिक्यूरिटीमध्ये शोचे शूटिंग करणार, असे वृत्त आहे. महत्वाचे म्हणजे, सेट वरील प्रत्येकाचे फोन टॅप केले जातील, असेही वृत्त आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, स्मृती इराणी झेड प्लस सुरक्षेत मालिकेचे शूटिंग करतील. शोच्या सेटवर लोकांना येण्या-जाण्यास बंदी असेल. याच वेळी, सेटवर जवळजवळ प्रत्येकाचे फोन टॅप केले जातील. मालिकेशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "अमर सर, स्मृती मॅम आणि एकता मॅम वगळता सर्वांचे फोन टॅप केले जातील. सेटवर कोणालाही फोन वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. स्मृती इराणी झेड प्लस सुरक्षेत मालिकेचे शूटिंग करतील. सर्वांना सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल."


'क्योंकी सास भी कभी बहू थी' ही स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका होती. ही मालिका २००० मध्ये सुरू झाली. या शोमध्ये स्मृती इराणी यांची मुख्य भूमिका होती. स्मृती व्यतिरिक्त रोनित रॉय, हितेन तेजवानी आणि सुधा शिवपुरी सारखे कलाकार या शोमध्ये होते. हा शो २००० ते २००८ पर्यंत टीव्हीवर प्रसारित झाला.या शोने एकूण ४७ पुरस्कार जिंकले होते. हा शो एकता कपूर यांनी तयार केला होता.

Comments
Add Comment

मोना सिंग यांचा मोठा खुलासा: TVF च्या मालिकेमुळे करिअरची दिशा बदलली, OTT वर झाली नव्या पर्वाची सुरुवात

TVF (द व्हायरल फीव्हर) हे भारतातील सर्वात मोठ्या कंटेंट प्रोड्यूसर्सपैकी एक असून, प्रेक्षकांना सातत्याने सर्वाधिक

KGF २ च्या असिस्टंट डायरेक्टरवर कोसळला दुःखाचा डोंगर; कीर्तन नादगौडांचा साडेचार वर्षीय मुलगा अपघातात दगावला

बंगळुरू : घरात लहान मूल असताना क्षणभराचे दुर्लक्षही किती मोठी किंमत मोजायला लावू शकते, याचा हृदयद्रावक अनुभव

हाय-प्रोफाइल लग्नातही करण जोहर जेवत नाही; कारण ऐकून बसाल थक्क

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते करण जोहर आपल्या चित्रपटांसोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही

दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प भेटीला

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांच्या

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

ज्येष्ठ संगीतकार ओ. पी नय्यर यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मंत्री आशिष शेलार यांची घोषणा; गायिका उत्तरा केळकर यांना मोहम्मद रफी पुरस्कार मुंबई: हिंदीमधील अजरामर