फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, पाच ठार आणि वीस जखमी

चंदिगड : पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील एका गावात शुक्रवारी सकाळी फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला आणि वीस जण जखमी झाले. ही घटना सिंगावाली-कोटली मार्गावरील दोन मजली काखान्यात घडली. स्फोटामुळे कारखान्याची दोन मजली इमारत कोसळली. फटाका हाताळणीत हयगय झाल्यामुळे स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. स्थानिक पोलीस स्फोट प्रकरणी तपास करत आहेत.

फटाका कारखान्यातील स्फोटात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचे शवविच्छेदन केल्यानंर मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना सरकारकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. स्फोटाचे कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तज्ज्ञांच्या सहकार्याने तपास सुरू केला आहे. ताज्या घटनेमुळे फटाका कारखान्यांमध्ये सुरक्षेसाठीच्या नियमांचे पालन होते की नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या