फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, पाच ठार आणि वीस जखमी

चंदिगड : पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील एका गावात शुक्रवारी सकाळी फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला आणि वीस जण जखमी झाले. ही घटना सिंगावाली-कोटली मार्गावरील दोन मजली काखान्यात घडली. स्फोटामुळे कारखान्याची दोन मजली इमारत कोसळली. फटाका हाताळणीत हयगय झाल्यामुळे स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. स्थानिक पोलीस स्फोट प्रकरणी तपास करत आहेत.

फटाका कारखान्यातील स्फोटात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचे शवविच्छेदन केल्यानंर मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना सरकारकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. स्फोटाचे कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तज्ज्ञांच्या सहकार्याने तपास सुरू केला आहे. ताज्या घटनेमुळे फटाका कारखान्यांमध्ये सुरक्षेसाठीच्या नियमांचे पालन होते की नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Comments
Add Comment

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.