आता प्लम्बर नाही तर वॉटर इंजिनिअर बोलावं लागणार;राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

नाशिक : आपल्या पदानुसार किंवा आपल्या कामानुसार आपल्याला एका टोपण नावाने ओळखले जाते,जसे रुग्णांना बरे करतात त्यांना डॉक्टर,शाळेत किंवा कॉलेज मध्ये शिकवणी घेतात त्यांना शिक्षक तसेच पाणी जोडणीचे काम करणाऱ्या व्यक्तीला आपण प्लम्बर अशा नावाने ओळखतो. परंतु, आता राज्य सरकार प्लम्बर या नावात बदल करून त्याचे वॉटर इंजिनिअर असे नामकरण करण्याच्या तयारीत आहे. यामुळे या व्यवसायाला समाजात अधिक मान्यता मिळेल.


मजुरांना सन्मान मिळावा यासाठी काही व्यवसायांच्या नावात बदल केला जाणार असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. सध्या प्लंबर हे घरगुती व औद्योगिक पाण्याच्या जोडण्या, नळांच्या दुरुस्त्या यांसारखी महत्त्वाचे कामे करत असले तरी त्यांना समाजात मिळणारा सन्मान फारसा नाही. त्यामुळे त्यांच्या योगदानाची योग्य दखल घेण्यासाठी आणि त्यांना व्यावसायिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी हा बदल सुचवण्यात आला आहे,अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.ते शुक्रवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.



याशिवाय, सरकार प्लंबरसाठी प्रशिक्षण केंद्रे, कौशल्य प्रमाणपत्र कार्यक्रम आणि सामाजिक सुरक्षेच्या योजना देखील आणण्याच्या तयारीत आहे. ‘वॉटर इंजिनिअर’ या नव्या ओळखीमुळे तरुण पिढीही या व्यवसायाकडे आकर्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


या नामकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. हा निर्णय अंतिम होण्यासाठी काही अधिकृत प्रक्रिया बाकी असली, तरी सामाजिक आणि व्यावसायिक स्तरावर या उपक्रमाचे स्वागत होत आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्लम्बर व्यावसायिकांना सामाजिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळेल अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे