आता प्लम्बर नाही तर वॉटर इंजिनिअर बोलावं लागणार;राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

  46

नाशिक : आपल्या पदानुसार किंवा आपल्या कामानुसार आपल्याला एका टोपण नावाने ओळखले जाते,जसे रुग्णांना बरे करतात त्यांना डॉक्टर,शाळेत किंवा कॉलेज मध्ये शिकवणी घेतात त्यांना शिक्षक तसेच पाणी जोडणीचे काम करणाऱ्या व्यक्तीला आपण प्लम्बर अशा नावाने ओळखतो. परंतु, आता राज्य सरकार प्लम्बर या नावात बदल करून त्याचे वॉटर इंजिनिअर असे नामकरण करण्याच्या तयारीत आहे. यामुळे या व्यवसायाला समाजात अधिक मान्यता मिळेल.


मजुरांना सन्मान मिळावा यासाठी काही व्यवसायांच्या नावात बदल केला जाणार असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. सध्या प्लंबर हे घरगुती व औद्योगिक पाण्याच्या जोडण्या, नळांच्या दुरुस्त्या यांसारखी महत्त्वाचे कामे करत असले तरी त्यांना समाजात मिळणारा सन्मान फारसा नाही. त्यामुळे त्यांच्या योगदानाची योग्य दखल घेण्यासाठी आणि त्यांना व्यावसायिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी हा बदल सुचवण्यात आला आहे,अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.ते शुक्रवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.



याशिवाय, सरकार प्लंबरसाठी प्रशिक्षण केंद्रे, कौशल्य प्रमाणपत्र कार्यक्रम आणि सामाजिक सुरक्षेच्या योजना देखील आणण्याच्या तयारीत आहे. ‘वॉटर इंजिनिअर’ या नव्या ओळखीमुळे तरुण पिढीही या व्यवसायाकडे आकर्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


या नामकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. हा निर्णय अंतिम होण्यासाठी काही अधिकृत प्रक्रिया बाकी असली, तरी सामाजिक आणि व्यावसायिक स्तरावर या उपक्रमाचे स्वागत होत आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्लम्बर व्यावसायिकांना सामाजिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळेल अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

Senior Citizen Suicide: ८६ वर्षीय आजोबांची आत्महत्या! सुसाइड नोटमध्ये लिहिले...

नेरळ मधील तलावात ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या करत संपवले जीवन नेरळ: आयुष्याला कंटाळून एका वृद्ध व्यक्तीने नेरळ