आता प्लम्बर नाही तर वॉटर इंजिनिअर बोलावं लागणार;राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

नाशिक : आपल्या पदानुसार किंवा आपल्या कामानुसार आपल्याला एका टोपण नावाने ओळखले जाते,जसे रुग्णांना बरे करतात त्यांना डॉक्टर,शाळेत किंवा कॉलेज मध्ये शिकवणी घेतात त्यांना शिक्षक तसेच पाणी जोडणीचे काम करणाऱ्या व्यक्तीला आपण प्लम्बर अशा नावाने ओळखतो. परंतु, आता राज्य सरकार प्लम्बर या नावात बदल करून त्याचे वॉटर इंजिनिअर असे नामकरण करण्याच्या तयारीत आहे. यामुळे या व्यवसायाला समाजात अधिक मान्यता मिळेल.


मजुरांना सन्मान मिळावा यासाठी काही व्यवसायांच्या नावात बदल केला जाणार असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. सध्या प्लंबर हे घरगुती व औद्योगिक पाण्याच्या जोडण्या, नळांच्या दुरुस्त्या यांसारखी महत्त्वाचे कामे करत असले तरी त्यांना समाजात मिळणारा सन्मान फारसा नाही. त्यामुळे त्यांच्या योगदानाची योग्य दखल घेण्यासाठी आणि त्यांना व्यावसायिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी हा बदल सुचवण्यात आला आहे,अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.ते शुक्रवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.



याशिवाय, सरकार प्लंबरसाठी प्रशिक्षण केंद्रे, कौशल्य प्रमाणपत्र कार्यक्रम आणि सामाजिक सुरक्षेच्या योजना देखील आणण्याच्या तयारीत आहे. ‘वॉटर इंजिनिअर’ या नव्या ओळखीमुळे तरुण पिढीही या व्यवसायाकडे आकर्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


या नामकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. हा निर्णय अंतिम होण्यासाठी काही अधिकृत प्रक्रिया बाकी असली, तरी सामाजिक आणि व्यावसायिक स्तरावर या उपक्रमाचे स्वागत होत आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्लम्बर व्यावसायिकांना सामाजिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळेल अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर

Gaurav More Marriage: हास्यजत्रेमधील 'फिल्टर पाड्याचा बच्चन' गौरव मोरे अडकला विवाहबंधनात, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई : आपल्या कॉमेडीनं संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा त्याचबरोबर फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून