निलेश चव्हाण अखेर नेपाळमध्ये सापडला; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई

पिंपरी-चिंचवड : पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला अखेर नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणा-या निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आलं आहे.


वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकणं, धमकावणं, आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असल्याच्या गंभीर आरोपाखाली निलेश चव्हाण फरार झाला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली होती.


पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी विशेष लक्ष केंद्रित करत, एक-दोन नव्हे तर तब्बल ६ शोध पथकं तयार केली होती. सुरुवातीला चव्हाण दुसऱ्या राज्यात लपल्याचा संशय होता, पण गोपनीय माहितीच्या आधारे तो नेपाळमध्ये असल्याचं स्पष्ट झालं आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली.



लवकरच निलेश चव्हाणला भारतात आणून न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडून आणखी अनेक महत्त्वाच्या बाबतीत माहिती मिळण्याची शक्यता असून, चौकशीत धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.


हा गुन्हा केवळ आत्महत्येपुरता मर्यादित नसून, त्यामागे दबाव, छळ आणि गुन्हेगारी साखळी असल्याचा संशय आहे, त्यामुळे पुढील तपास अधिक गंभीर आणि व्यापक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी