कधी होणार महापालिकांच्या निवडणुका ? मंत्री बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

सोलापूर : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. महापालिका निवडणुका कधीही होऊ शकतात. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होण्याची दाट शक्यता असल्याचे बावनकुळे म्हणाले. निवडणुकांचे वेळापत्रक तयार करण्याचे सर्वाधिकार निवडणूक आयोगाकडे आहेत. आयोगाने वेळापत्रक जाहीर केले की, राज्य सरकार यंत्रणा म्हणून त्यांना सहकार्य करेल; असे बावनकुळेंनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सत्ताधारी हे महायुती म्हणूनच लढवतील. अपवादात्मक ठिकाणी महायुतीतील पक्ष फ्रेंडली फाईट अर्थात मैत्रिपूर्ण लढती लढतील, असे संकेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेमतेम चार महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली. या दोन्ही निवडणुकांमध्ये महायुतीमधील पक्ष एकत्र लढले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही महायुतीतील घटक पक्ष व्यवस्थित नियोजन करण्यात गुंतले असल्याचे बावनकुळे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीवेळी इंडी आघाडीने राज्यातील बहुसंख्य जागा जिंकल्या. पण विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. महायुतीने राज्यात दणदणीत विजय मिळवला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठी महत्त्वाच्या आहेत. भाजपाचे मुख्य लक्ष्य मुंबई महापालिका आहे. सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेली मुंबई ही देशातली पहिल्या क्रमांकाची महापालिका सध्या प्रशासकांच्या नियंत्रणात आहे. याआधी मागील २५ वर्षे मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती. भाजपाने मागच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेपुढे तगडे आव्हान उभे केले होते. यामुळे आता काय होणार ? याकडे अनेकांचे लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिउबाठापुढे भाजपाचे तगडे आव्हान आहे.

काही दिवसांपूर्वी उद्धव आणि राज युती करणार अशी चर्चा निवडक प्रसारमाध्यमांमधून रंगवली जात होती. पण आता ही चर्चा थांबली आहे. पुण्यात दोन्ही पवार गट एकत्र येतील अशीही चर्चा आहे. पण प्रत्यक्षात काहीही घडलेले नाही. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यावर कोणता राजकीय पक्ष काय खेळी करतो याकडे अनेकांचे लक्ष आहे.
Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी

मशीदीवरचे भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देऊन उद्धव ठाकरेंनी प्रचार केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; कुणाचाही महापौर झाला तरी आम्ही भोंग्यांना परवानगी देणार नाही मुंबई :

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान