कधी होणार महापालिकांच्या निवडणुका ? मंत्री बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

सोलापूर : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. महापालिका निवडणुका कधीही होऊ शकतात. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होण्याची दाट शक्यता असल्याचे बावनकुळे म्हणाले. निवडणुकांचे वेळापत्रक तयार करण्याचे सर्वाधिकार निवडणूक आयोगाकडे आहेत. आयोगाने वेळापत्रक जाहीर केले की, राज्य सरकार यंत्रणा म्हणून त्यांना सहकार्य करेल; असे बावनकुळेंनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सत्ताधारी हे महायुती म्हणूनच लढवतील. अपवादात्मक ठिकाणी महायुतीतील पक्ष फ्रेंडली फाईट अर्थात मैत्रिपूर्ण लढती लढतील, असे संकेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेमतेम चार महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली. या दोन्ही निवडणुकांमध्ये महायुतीमधील पक्ष एकत्र लढले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही महायुतीतील घटक पक्ष व्यवस्थित नियोजन करण्यात गुंतले असल्याचे बावनकुळे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीवेळी इंडी आघाडीने राज्यातील बहुसंख्य जागा जिंकल्या. पण विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. महायुतीने राज्यात दणदणीत विजय मिळवला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठी महत्त्वाच्या आहेत. भाजपाचे मुख्य लक्ष्य मुंबई महापालिका आहे. सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेली मुंबई ही देशातली पहिल्या क्रमांकाची महापालिका सध्या प्रशासकांच्या नियंत्रणात आहे. याआधी मागील २५ वर्षे मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती. भाजपाने मागच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेपुढे तगडे आव्हान उभे केले होते. यामुळे आता काय होणार ? याकडे अनेकांचे लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिउबाठापुढे भाजपाचे तगडे आव्हान आहे.

काही दिवसांपूर्वी उद्धव आणि राज युती करणार अशी चर्चा निवडक प्रसारमाध्यमांमधून रंगवली जात होती. पण आता ही चर्चा थांबली आहे. पुण्यात दोन्ही पवार गट एकत्र येतील अशीही चर्चा आहे. पण प्रत्यक्षात काहीही घडलेले नाही. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यावर कोणता राजकीय पक्ष काय खेळी करतो याकडे अनेकांचे लक्ष आहे.
Comments
Add Comment

अखेर स्वप्न पूर्ण, भारताने जिंकला महिला विश्वचषक; दीप्तीने घेतल्या ५ विकेट

नवी मुंबई : अखेर भारताचे स्वप्न साकार झाले. भारताच्या महिला संघाने आयसीसी वर्ल्डकप पहिल्यांदाच जिंकला. नाणेफेक

बंडगार्डनमध्ये भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू ; तिसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : रविवारी पहाटे बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अजित पवार सलग चौथ्यांदा राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची सलग चौथ्यांदा राज्याच्या

नौदलासाठी इस्रोने प्रक्षेपित केला उपग्रह

श्रीहरिकोटा : भारतीय नौदलाठी इस्रोने LVM3-M5/CMS-03 या रॉकेटमधून एका उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहामुळे

साखरेचा गाळप हंगाम सुरू, पहिल्याच दिवशी २८ कारखान्यांना परवाने

पुणे (प्रतिनिधी): राज्यातील साखर गाळप हंगाम शनिवारपासून सुरु झाला. पहिल्याच दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप

स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी, मोडला मिताली राजचा विक्रम

नवी मुंबई : डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू असलेल्या आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ च्या फायनल मॅचमध्ये भारतीय