पनवेलमधून आणखीन एक वैष्णवी हगवणे प्रकरण समोर, चिमुकलीसह संपवले जीवन

पनवेल: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरातून या पद्धतीची अनेक धक्कादायक प्रकरणं आता उघड होत आहेत. पनवेल तालुक्यातही याच पद्धतीची एक घटना उघडकीस आली आहे. पनवेल तालुक्यातील पेठाली गावात सोनम अभिषेक केणी (वय ३०) हिने आपल्या देवांशी या पाच वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  सुरुवातीला पोलिसांनी मुलीचा अपघाती मृत्यू व सोनमने नैराश्यातून आत्महत्या केल्याची नोंद केली होती. मात्र, ही आत्महत्या नसून सासरच्यांनी छळ करून हत्या केल्याचा आरोप सोनमच्या माहेरच्यांनी केला आहे. 24 एप्रिल रोजी सोनमनं गळफास लावून जीव दिल्याची माहिती आहे.

मुलासाठी आणि माहेराहून पैसे आणण्यासाठी होत होता मानसिक छळ


सोनमच्या वडिलांनी 1 मे रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नापासून मुलगा नसल्याने आणि माहेरून पैसे आणण्यासाठी सोनमचा सासरच्यांकडून सतत तिचा  मानसिक छळ होत होता. या आधारावर पोलिसांनी पती अभिषेक केणी, सासू प्रभावती केणी आणि चार नणंदां विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पती आणि सासू फरार


सोनमने मुलीचा खून केला की दोघींचाही मृत्यू अन्य कारणाने झाला, याचा तपास पोलीस करत असून, सोनमची सुसाईड नोट व वैद्यकीय अहवालातून सत्य समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेला महिना उलटूनही मुख्य आरोपी अभिषेक आणि त्याची आई प्रभावती फरार असल्याने सोनमच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. तळोजा पोलिसांकडून सोमनच्या चारही नणंदांची चौकशी सुरू असून, फरार आरोपींच्या शोधासाठी तीन विशेष पथके तयार केली आहेत.
Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे