नविद हसन मुश्रीफ गोकुळचे नवे अध्यक्ष

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाची निवड झाली आहे. नविद हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अर्थात 'गोकुळ'चे नवे अध्यक्ष झाले आहेत. आज म्हणजेच शुक्रवार ३० मे रोजी दुपारी तीन वाजता झालेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या बैठकीत नव्या अध्यक्षांच्या निवडीची घोषणा झाली. ही घोषणा होताच नविद हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी आणि हितचिंतकांनी जल्लोष केला.

मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदावरुन उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. राजकीय वर्तुळातही कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'च्या अध्यक्षपदावरुन उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेचा गंभीरपणे विचार करुन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'ने नव्या अध्यक्षांच्या निवडीची घोषणा केली. नविद हसन मुश्रीफ यांच्यामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अर्थात 'गोकुळ'च्या अध्यक्षपदी महायुतीच्या नेत्याची निवड झाली आहे.
Comments
Add Comment

महिला सफाई कर्मचाऱ्यांना ‘लाडकी कर्मचारी बहीण’ म्हणून गौरवणार; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई: ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ आणि ‘रस्ते स्वच्छता योजना’ अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना

मुंबईत उभारणार मल्टी-मॉडेल टनेल; रस्ते वाहतुकीसोबतच सेवा सुविधांच्या जाळ्यांसाठी असेल स्वतंत्र मार्ग

मुंबई: वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरस्थितीवर प्रभावी

मुंबईतील फोर्ट परिसरात आग; बाबेल हॉटेलच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर...

मुंबई: मुंबईतील फोर्ट परिसरात आग लागली. ही आग ग्राउंड आणि वरच्या दोन मजल्यांवर लागली. तसेच ती हॉटेल इमारतीच्या

Israel vs Iran War Ali Khamenei Death: मोठी अपडेट, इराणचे सुप्रीम लीडर यातुल्ला अली खामेनींचा मृत्यू; इस्रायलच्या पंतप्रधानांनी केला दावा बेंजामिन नेतान्याहू

दिल्ली: जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाबाबत महत्तवाची अपडेट समोर आली.

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

मध्यपूर्व देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी

दिल्ली: मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या