इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील २६ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय

कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या अधिका-यांशी यशस्वी तोडगा


मुंबई: इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील सुमारे २६ हजार कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती घेण्यात आल्याची माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज दिली.


या संदर्भात आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, विमानतळावरील विविध कंपन्यांच्या कामगारांच्या अनेक समस्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होत्या. पंरतू, त्यांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. याचसंदर्भात विमानतळावरील इंडिगो एअरलाईन्स या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला व आपल्या न्याय मागण्या मांडल्या भाजपाकडे मांडल्या होत्या. त्यामुळे या सर्व कर्मचा-यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेत या गंभीर विषयाच्या अनुषंगाने भाजपच्या माध्यमातून कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा करण्यात आली.


कंपनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या या रास्त होत्या, त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे या बाबत यशस्वी तोडगा काढण्याच्या दृष्टीने गेले काही महिने व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांशी वारंवार बैठका घेण्यात आल्या. अखेर, कर्मचाऱ्यांचे हित ध्यानात घेऊन इंडिया एअरलाईन्स कंपनीच्या मुंबई व गोवा सह देशभरातील सुमारे 26 हजार कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याची भाजपची मागणी मान्य करण्यात आली. व त्या दृष्टीने प्रक्रिया करुन निर्णय घेण्यात आला. याचा लाभ देशभरातील कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार असून त्यांच्यावरील गेले काही वर्षे सूरु असलेला अन्याय दूर झालेला आहे, असे श्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने नेहमीच कामगारांच्या हिताचा विचार केला आणि कोणत्याही कामगारांवर अन्याय होणार नाही याची काळजी पक्षाने घेतली. त्यामुळे इंडिगो कंपनीच्या कर्मचा-यांच्या मागण्यांसाठी कंपनीच्या व्यवस्थापन समिती समवेत झालेल्या चर्चेअंती यशस्वी तोडगा निघाला असून प्रत्येक कामगारांना चांगली पगारवाढ मिळेल याची दक्षता घेण्यात आल्याचे श्री. रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तसेच भविष्यात कामगारांच्या वेतनासोबतच इतर प्रलंबित प्रश्नांसंदर्भात देखील व्यवस्थापन समितीच्या अधिका-यांमसमेवत होणा-या पुढील बैठकांमध्ये वेळोवेळी चर्चा करण्यात येईल, असेही श्री.चव्हाण यांनी स्पष्ट केले.


या पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस सुहास माटे, संयुक्त सरचिटणीस योगेश आवळे, इंडिगो एअरलाईन्स कंपनी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष करण कांबळे, सचिव दिनेश शेवाळे, चंदन कडू, सिराज हाशमी, शैलेश पवार, देवेंद्र पोळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Ganeshotsav 2026 ST Buses : बाप्पाच्या आगमनासाठी एसटी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरमधून धावणार शेकडो जादा बसेस; ‘या’ तारखेपासून विशेष सेवा

मुंबई : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असून, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे.

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Devendra Fadnavis : भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला

Ganpati Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना