इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील २६ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय

कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या अधिका-यांशी यशस्वी तोडगा


मुंबई: इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील सुमारे २६ हजार कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती घेण्यात आल्याची माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज दिली.


या संदर्भात आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, विमानतळावरील विविध कंपन्यांच्या कामगारांच्या अनेक समस्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होत्या. पंरतू, त्यांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. याचसंदर्भात विमानतळावरील इंडिगो एअरलाईन्स या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला व आपल्या न्याय मागण्या मांडल्या भाजपाकडे मांडल्या होत्या. त्यामुळे या सर्व कर्मचा-यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेत या गंभीर विषयाच्या अनुषंगाने भाजपच्या माध्यमातून कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा करण्यात आली.


कंपनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या या रास्त होत्या, त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे या बाबत यशस्वी तोडगा काढण्याच्या दृष्टीने गेले काही महिने व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांशी वारंवार बैठका घेण्यात आल्या. अखेर, कर्मचाऱ्यांचे हित ध्यानात घेऊन इंडिया एअरलाईन्स कंपनीच्या मुंबई व गोवा सह देशभरातील सुमारे 26 हजार कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याची भाजपची मागणी मान्य करण्यात आली. व त्या दृष्टीने प्रक्रिया करुन निर्णय घेण्यात आला. याचा लाभ देशभरातील कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार असून त्यांच्यावरील गेले काही वर्षे सूरु असलेला अन्याय दूर झालेला आहे, असे श्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने नेहमीच कामगारांच्या हिताचा विचार केला आणि कोणत्याही कामगारांवर अन्याय होणार नाही याची काळजी पक्षाने घेतली. त्यामुळे इंडिगो कंपनीच्या कर्मचा-यांच्या मागण्यांसाठी कंपनीच्या व्यवस्थापन समिती समवेत झालेल्या चर्चेअंती यशस्वी तोडगा निघाला असून प्रत्येक कामगारांना चांगली पगारवाढ मिळेल याची दक्षता घेण्यात आल्याचे श्री. रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तसेच भविष्यात कामगारांच्या वेतनासोबतच इतर प्रलंबित प्रश्नांसंदर्भात देखील व्यवस्थापन समितीच्या अधिका-यांमसमेवत होणा-या पुढील बैठकांमध्ये वेळोवेळी चर्चा करण्यात येईल, असेही श्री.चव्हाण यांनी स्पष्ट केले.


या पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस सुहास माटे, संयुक्त सरचिटणीस योगेश आवळे, इंडिगो एअरलाईन्स कंपनी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष करण कांबळे, सचिव दिनेश शेवाळे, चंदन कडू, सिराज हाशमी, शैलेश पवार, देवेंद्र पोळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Suryakumar Yadav : टीम इंडियानंतर आता मुंबई इंडियन्सची साथही सोडणार? सूर्यकुमार यादवच्या भविष्याबाबत चर्चांना उधाण

MUMBAI: भारतीय क्रिकेट संघाच्या टी-20 कर्णधारपदावरून हटवल्यानंतर आणि आगामी आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय

Suicide News : अटल सेतूवरून तरुणाची समुद्रात उडी; युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू

नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) अटल सेतू पुलावरून (Atal Setu Bridge) एका २८ वर्षीय तरुणाने समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक

Dadar Bus Accident : दादरमध्ये भीषण अपघात! भरधाव बसचा कहर; ३ बाईक, टॅक्सी आणि ओला-उबेरला धडक, एकाचा मृत्यू, अनेक जखमी

मुंबई : दादर येथील प्लाझा परिसरात सोमवारी भीषण अपघात घडल्याने एकच खळबळ उडाली. भरधाव वेगाने आलेल्या एका बसने तीन

MahaDBT Students Scheme : मोठ्या शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३० हजार रुपये मिळणार; कोण पात्र? जाणून घ्या

मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये उच्च शिक्षण (Higher Education) घेणे अनेक

Goregaon-Mulund Link Road (GMLR) : दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान उड्डाणपूल १५ जुलैपर्यंत होणार खुले?

मुंबई : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान

Online Fraud : ॲपच्या नादात फ्लॅट पडला महागात ....

मुंबई : मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्या हक्काचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण वाढत्या महागाईमुळे