कोलाडमधील नागरिकांची मिटणार पाण्याची चिंता

२८ धरणातील जलसाठ्यात ११ टक्क्यांनी वाढ


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कोलाड पाटबंधारे विभागाच्या २८ धरणांत २१ मे रोजी २७ टक्केच जलसाठा शिल्लक होता. सात धरणात दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक होता; मात्र त्यानंतर चार-पाच दिवस सलग पडलेल्या पावसाने त्यांच्या जलसाठ्यात ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुतारवाडी धरण शंभर टक्के भरले असून, त्याखालोखाल पाभरे धरण भरले आहे. धरणांमधील वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे नागरिकांची पाण्याची चिंता मिटणार आहे.


रायगड जिल्ह्यात मुरुड, तळा, रोहा, पेण, उरण आणि अलिबाग तालुक्य़ात प्रत्येकी एक, सुधागड तालुक्यात पाच, श्रीवर्धन तालुक्यात तीन, म्हसळा तालुक्यात दोन, महाड तालुक्यात चार, कर्जत तालुक्यात, खालापूर तालुक्यात तीन, पनवेल तालुक्यात तीन, या १३ तालुक्यांत २८ धरणे आहेत. यामधून जिल्ह्यातील, तसेच नवी मुंबईतील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या सर्व धरणात ६८.२६१ दलघमी पाण्याच्या साठ्याची क्षमता असून, मे महिन्यापर्यंत जलसाठा कमी होत जातो. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात २८ धरणात यावेळी २७ टक्केच जलसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे मे महिना संपेपर्यंत पाण्याचे संकट गडद होण्याची शक्यता होती; मात्र २५ मेपासून सुरू झालेल्या पावसाने जलसाठा वाढण्यास मदत मिळाल्याने पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे.सात दिवसात सरासरी ५०४ मिमी पाऊस पडला. रायगड जिल्ह्यात २२ मेपासून धुवाँधार पाऊस पडल्याने आतापर्यंत सरासरी ५०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक २२१ मिमी पावसाची नोंद मुरुड तालुक्यात झाली, तर सर्वात कमी १९२ मिमी नोंद माणगावमध्ये झाली आहे. आठवडाभर पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, तर रस्ते खचले आहेत. बुधवारी सकाळी पावसाने उघडीप दिल्यानंतर अर्धवट तुटलेली झाडे तोडण्याचे काम ठिकठिकाणी सुरू होते.


काही ठिकाणी अर्धवट तुटलेली घरे व्यवस्थित करण्याचे काम सुरू होते. रस्त्याच्या कडेला तुटलेली झाडे तोडण्याकरिता काही तासांसाठी वाहतूक बंद करण्यात आली होती. म्हसळा, मुरुड, श्रीवर्धन, माथेरान, रोहा या तालुक्यांमध्ये ५०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत १३ कच्च्या आणि २६० पक्क्या घरांचे नुकसान झाले आहे.


आठवडाभरातील तालुकानिहाय पर्जन्यमान
आठवडाभरात मुरुड तालुक्यात तब्बल २९१ मिमी, तर म्हसळा तालुक्यात ७८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल श्रीवर्धन ७७०, तळा ६३९, पनवेल ६०५.५, रोहा ५०४, माथेरान ४०९, सुधागड ३७२, पेण ३६८, महाड ३२८, खालापूर २८६, उरण २५४, कर्जत २४२, माणगाव १९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Comments
Add Comment

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात झाली. याअंतर्गत एअर इंडिया

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण

Kokan Railway : प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद; 16 जुलैपासून इंटरसिटी, डेक्कन क्वीन पुन्हा रुळावर

रायगड : मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त गाड्या

Mumbai-Goa Express Highway : कशेडी घाटात दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद, एकाच लेनवरून दुहेरी वाहतूक

पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Goa National Highway) प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून अबू धाबीसाठी आठवड्यातून तीन दिवस थेट विमान सेवा

नवी मुंबई विमानतळ : अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) संचलित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NHIA)