डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या मुलीवर यशस्वी उपचार

  22

मुंबई : दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक झालेल्या अपघातात पुढे उभ्या असलेल्या ३ वर्षांच्या मुलीच्या कवटीला गंभीर दुखापत झाली. अशा परिस्थितीत प्रसंगावधान राखत न्यूरोसर्जन डॉ. खुर्शीद अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली टीमने या तीन वर्षीय अरिबा खुरेशीवर गुंतागुंतीची व आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. पवई येथील डॉ. एल. एच. हिरानंदानी रुग्णालयात ही गुंतागुंतीची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडत तिला नवे आयुष्य मिळवून दिले.


न्यूरोसर्जन डॉ. खुर्शीद अन्सारी, प्लास्टिक सर्जन डॉ. दीपेश मालवीय, नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. शिवकुमार आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. संजीव आहुजा यांच्यासह टिमने या चिमुरडीवर यशस्वी उपचार केले. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि वेळीच केलेल्या उपचारांमुळे तिचा जीव वाचविता आला आणि आता ती बरी होत आहे.
अचानक झालेल्या अपघाताने दुचाकी वाहनावर(स्कुटीवर) समोर उभ्या असलेल्या या चिमुरडीच्या डोक्याला मोठी दुखापत झाली, ज्यामुळे तिच्या कवटीचे तुकडे झाले आणि डोक्याच्या हाडाला गंभीररीत्या मार बसला. तिला बेशुद्ध अवस्थेतच पवईतील डॉ. एल एच हिरानंदानी रुग्णालयात हलविण्यात आले.


पवई येथील डॉ. एल एच हिरानंदानी रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. खुर्शीद अन्सारी यांनी या प्रकरणाविषयी आणि या स्थितीतचे वर्ण करताना "तुटलेल्या अंड्याच्या कवचाला एकत्र जोडणे" असे हे प्रकरण असल्याचे स्पष्ट केले. रुग्णाला त्वरीत शस्त्रक्रियेची आवश्यकता होती, म्हणून डॉ. अन्सारी यांनी प्लास्टिक सर्जन डॉ. दीपेश मालवीय यांच्या सहकार्याने तिची कवटी पुन्हा बांधली ती दुरुस्ती केली. तिच्या कवटीत निर्माण झालेले अंतर भरण्यासाठी, त्यांनी मुलीच्या शरीरातील ऊतींचा वापर केला. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या आठ दिवसातच तिच्यात सुधारणा दिसून आली. तिने स्वतःहून डोळे उघडले.

Comments
Add Comment

शिगवे बहुला येथे पॅराशूट कोसळले

भगूर : नाशिक जवळील शिंगवे बहुला गावातील घरावर लष्कराचे पॅराशुट ( ग्लायडर ) कोसळले. सुदैवाने यात कुठलीही जीवित

बंगळुरु चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या तीन महिन्यानंतर आरसीबीची भावुक पोस्ट

नवी दिल्ली :  आयपीएल २०२५ चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अखेर सोशल मीडियावर परतले आहे. त्यांनी बंगळुरूमधील

विरार दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई : विरार भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल मुख्यमंत्री

दरवर्षी २३ सप्टेंबरला साजरा होणार आयुर्वेद दिवस

नवी दिल्ली : भारत सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेत आयुर्वेद दिवसाची तारीख कायमची ठरवली आहे. मार्च २०२५ मध्ये

संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थीमधील फरक काय आहेत

मुंबई: हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील चतुर्थी

टाटा समुहाच्या ट्रेंट लिमिटेडचा 'बर्न्ट टोस्ट' लाँच भारताच्या पुढच्या पिढीसाठी नवीन फॅशन 'व्हॉइस'

मुंबई: सणासुदीच्या मुहूर्तावर टाटा समुहाची लाईफस्टाईल कंपनी ट्रेंट लिमिटेडने (Trent Limited) भारतातील पुढील पिढीतील