पीओके लवकरच आपले होईल- राजनाथ सिंह

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीर (पीओके) लवकरच भारताला परत मिळेल आणि तेथील लोक भारतात परततील असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. ते सीआयआय वार्षिक व्यापार शिखर परिषदेत बोलत होते.


यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की मेक इन इंडिया हा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेतील एक महत्त्वाचा घटक आहे. जर आपल्याकडे ही क्षमता नसती तर आपले सैन्य पाकिस्तानला पराभूत करू शकले नसते. दहशतवादाचा व्यवसाय चालवणे हे किफायतशीर नाही. उलट, त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागू शकते. पाकिस्तानला आता हे चांगलेच कळले आहे. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारतीय सैन्याच्या शौर्याचा उल्लेख करताना काही दिवसांपूर्वी राजनाथ म्हणाले होते की भारतीय सैन्याने एका तज्ञ सर्जनप्रमाणे पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला आणि शत्रू देशाच्या सैन्याला गुडघे टेकवले.


'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिल्यांदाच त्यांच्या संसदीय मतदारसंघ लखनऊला पोहोचलेल्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले होते की, दहशतवादाविरुद्ध सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर यशस्वी हल्ला केला आणि मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळवले. ते म्हणाले की, भारतीय सैन्याने एका कुशल डॉक्टर आणि सर्जनसारखे काम केले. ज्याप्रमाणे एक कुशल सर्जन रोगाचे मूळ असलेल्या ठिकाणी आपली उपकरणे वापरतो, त्याचप्रमाणे भारतीय सैन्यानेही दहशतवादाच्या मुळांवर आपली शस्त्रे अत्यंत अचूकतेने वापरली. परंतु पाकिस्तानने भारतातील सामान्य नागरिकांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याचे राजनाथ यांनी सांगितले.

Comments
Add Comment

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतात वादळी पावसाची शक्यता

नवी दिल्ली : पश्चिमी विक्षोभामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत अशा तीन देशांच्या सीमा ओलांडणारा तब्बल १,०००

सौदी अरेबियातील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू; भारतीय दूतावासाकडून शोकसंवेदना

सौदी अरेबियातील रियाध येथे १८ मार्च रोजी एका भारतीय नागरिकाच्या दुर्दैवी मृत्यूबाबत भारतीय दूतावासाने

भारताने होर्मुजच्या सामुद्रधुनीला शोधला सुरक्षित पर्याय

नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू आहे. इराणने

India-China Relations : भारत चीन संबंध अधिक दृढ होणार; बीजिंग आणि दिल्ली दरम्यानची थेट विमानसेवा पुन्हा सुरू

भारत आणि चीन दरम्यानची हवाई वाहतूक आता पूर्ववत होत आहे. नवी दिल्ली आणि चीनची राजधानी बीजिंग दरम्यानची विमानसेवा

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस व बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशच्या उंच भागांत शुक्रवारी (२० मार्च) जोरदार हिमवृष्टी तर खालच्या भागांत मुसळधार पाऊस झाला. लाहौल

गुजरातमधील आश्रमात बनावट नोटांचा गोरखधंदा उघड

 पोलिसांकडून २ कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त  अहमदाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई अहमदाबाद  :  नाशिकमधील