PBKS vs RCB, IPL 2025: पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु कोण अंतिम फेरीत पोहोचेल?

मुंबई(सुशील परब): आयपीएल २०२५ लढत आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज क्लॉलिफायरचा पहिला सामना खेळला जाणार असून हा पहिला सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुमध्ये होणार आहे. ही एक रोमांचक लढत होणार असून दोन्ही संघ मजबूत आहेत. तसेच पंजाब किंग्ज यांनी या हंगामात सर्वाधिक विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले. त्याचप्रमाणे त्यांची सांघिक कामगिरी ही उत्तम असल्याचे दिसून येते. त्यांचे सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग शानदार खेळी करत सध्या चांगलेच फॉर्ममध्ये आहेत.


मुंबई विरुद्ध प्रियांश आर्यने ३५ चेंडूंत ६२ धावांची शानदार खेळी केली, त्याला जोश इंग्लिसची चांगली साथ मिळाली होती त्यामुळे त्यानेही अर्धशतक झळकावले होते. तसेच कर्णधार श्रेयस अय्यर, नेहल वधेरा, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस अशा चांगल्या फलंदाजांची फळी त्यांच्याकडे असून अर्शदीप सिंग, हरप्रित ब्रार, मार्को जेन्सन, विजयकुमार असे चांगले गोलंदाजही आहेत. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने सातही बाहेरचे सामने जिंकले असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याला फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार, मयांक अग्रवाल, जितेश शर्मा, रामारीओ शेफर्ड, कुणाल पंड्या यांची साथ आहे. तसेच जोश हेजलवूड गोलंदाजीत प्रभावी ठरू शकतो. भुवनेश्वर कुमार, नुवान तुशारा, यश दयाल, रोमारियो शेफर्ड असे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत.


संघाच्या कामगिरीनुसार पंजाब किंग्ज थोडेसे वरचढ वाटत असून घरच्या मैदानावर खेळण्याचा पंजाबला फायदा होईल. मात्र हरलेली बाजी पलटविण्यात आरसीबी माहीर आहे. त्याचप्रमाणे हे मैदान फलंदाजीला अनुकूल आहे. यामुळे आरसीबीचा अनुभव आणि विराट कोहलीचा फॉर्म त्यांना विजय मिळवून देऊ शकतो का ते पाहुया. हा सामना चंदिगडला होत असल्यामुळे पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. तसेच पावसामुळे सामना रद्द झाला तर पंजाब अंतिम फेरीत पोहोचेल व आरसीबी दुसरा क्लॉलिफाय सामना खेळेल. चला तर पाहुया पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु जिंकतो की पाऊस जिंकतो?

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात