PBKS vs RCB, IPL 2025: पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु कोण अंतिम फेरीत पोहोचेल?

मुंबई(सुशील परब): आयपीएल २०२५ लढत आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज क्लॉलिफायरचा पहिला सामना खेळला जाणार असून हा पहिला सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुमध्ये होणार आहे. ही एक रोमांचक लढत होणार असून दोन्ही संघ मजबूत आहेत. तसेच पंजाब किंग्ज यांनी या हंगामात सर्वाधिक विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले. त्याचप्रमाणे त्यांची सांघिक कामगिरी ही उत्तम असल्याचे दिसून येते. त्यांचे सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग शानदार खेळी करत सध्या चांगलेच फॉर्ममध्ये आहेत.


मुंबई विरुद्ध प्रियांश आर्यने ३५ चेंडूंत ६२ धावांची शानदार खेळी केली, त्याला जोश इंग्लिसची चांगली साथ मिळाली होती त्यामुळे त्यानेही अर्धशतक झळकावले होते. तसेच कर्णधार श्रेयस अय्यर, नेहल वधेरा, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस अशा चांगल्या फलंदाजांची फळी त्यांच्याकडे असून अर्शदीप सिंग, हरप्रित ब्रार, मार्को जेन्सन, विजयकुमार असे चांगले गोलंदाजही आहेत. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने सातही बाहेरचे सामने जिंकले असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याला फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार, मयांक अग्रवाल, जितेश शर्मा, रामारीओ शेफर्ड, कुणाल पंड्या यांची साथ आहे. तसेच जोश हेजलवूड गोलंदाजीत प्रभावी ठरू शकतो. भुवनेश्वर कुमार, नुवान तुशारा, यश दयाल, रोमारियो शेफर्ड असे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत.


संघाच्या कामगिरीनुसार पंजाब किंग्ज थोडेसे वरचढ वाटत असून घरच्या मैदानावर खेळण्याचा पंजाबला फायदा होईल. मात्र हरलेली बाजी पलटविण्यात आरसीबी माहीर आहे. त्याचप्रमाणे हे मैदान फलंदाजीला अनुकूल आहे. यामुळे आरसीबीचा अनुभव आणि विराट कोहलीचा फॉर्म त्यांना विजय मिळवून देऊ शकतो का ते पाहुया. हा सामना चंदिगडला होत असल्यामुळे पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. तसेच पावसामुळे सामना रद्द झाला तर पंजाब अंतिम फेरीत पोहोचेल व आरसीबी दुसरा क्लॉलिफाय सामना खेळेल. चला तर पाहुया पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु जिंकतो की पाऊस जिंकतो?

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए