PBKS vs RCB, IPL 2025: पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु कोण अंतिम फेरीत पोहोचेल?

  103

मुंबई(सुशील परब): आयपीएल २०२५ लढत आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज क्लॉलिफायरचा पहिला सामना खेळला जाणार असून हा पहिला सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुमध्ये होणार आहे. ही एक रोमांचक लढत होणार असून दोन्ही संघ मजबूत आहेत. तसेच पंजाब किंग्ज यांनी या हंगामात सर्वाधिक विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले. त्याचप्रमाणे त्यांची सांघिक कामगिरी ही उत्तम असल्याचे दिसून येते. त्यांचे सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग शानदार खेळी करत सध्या चांगलेच फॉर्ममध्ये आहेत.


मुंबई विरुद्ध प्रियांश आर्यने ३५ चेंडूंत ६२ धावांची शानदार खेळी केली, त्याला जोश इंग्लिसची चांगली साथ मिळाली होती त्यामुळे त्यानेही अर्धशतक झळकावले होते. तसेच कर्णधार श्रेयस अय्यर, नेहल वधेरा, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस अशा चांगल्या फलंदाजांची फळी त्यांच्याकडे असून अर्शदीप सिंग, हरप्रित ब्रार, मार्को जेन्सन, विजयकुमार असे चांगले गोलंदाजही आहेत. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने सातही बाहेरचे सामने जिंकले असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याला फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार, मयांक अग्रवाल, जितेश शर्मा, रामारीओ शेफर्ड, कुणाल पंड्या यांची साथ आहे. तसेच जोश हेजलवूड गोलंदाजीत प्रभावी ठरू शकतो. भुवनेश्वर कुमार, नुवान तुशारा, यश दयाल, रोमारियो शेफर्ड असे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत.


संघाच्या कामगिरीनुसार पंजाब किंग्ज थोडेसे वरचढ वाटत असून घरच्या मैदानावर खेळण्याचा पंजाबला फायदा होईल. मात्र हरलेली बाजी पलटविण्यात आरसीबी माहीर आहे. त्याचप्रमाणे हे मैदान फलंदाजीला अनुकूल आहे. यामुळे आरसीबीचा अनुभव आणि विराट कोहलीचा फॉर्म त्यांना विजय मिळवून देऊ शकतो का ते पाहुया. हा सामना चंदिगडला होत असल्यामुळे पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. तसेच पावसामुळे सामना रद्द झाला तर पंजाब अंतिम फेरीत पोहोचेल व आरसीबी दुसरा क्लॉलिफाय सामना खेळेल. चला तर पाहुया पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु जिंकतो की पाऊस जिंकतो?

Comments
Add Comment

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब

Team India Asia Cup 2025: आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या करणार नेतृत्व; शुभमन गिल उपकर्णधार

Team India T20 Squad for Asia Cup 2025: दिनांक ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ साठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.