मेट्रो स्थानकात पाणी न साचण्यासाठी करावी लागणार उपाययोजना

मुंबई : मागील सोमवारी शहर भागांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वरळी आचार्य अत्रे रेल्वे स्थानक परिसरात पाणी शिरल्याने भविष्यात या मेट्रो स्थानकात असेच पाणी शिरले जाईल का अशाप्रकारची भीती वजा शंका लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. परंतु मुंबई मेट्रो वनच्या माध्यमातून या स्थानकांच्या परिसरातील पावसाचे पाणी निचरा करण्यासाठी स्वत: पंप बसवण्याचा यंत्रणा उभी केली असली तरी यासर्व स्थानक परिसरातील आजवर पडलेला पाऊस आणि साचलेला पाऊस याची माहिती जाणून घेवून मेट्रो आणि महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्यावतीने संयुक्त सर्वे करून उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे मत काही निवृत्त अधिकाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.


मुंबई शहरातील काही भागांमध्ये सोमवारी सरासरी २०० ते २२५ मि.मी पावसाची नोंद झाल्याने या अचानक कोसळलेल्या पहिल्या पावसातच वरळीतील आचार्य अत्रे ऍक्वॉ मेट्रो रेल्वे स्थानकात प्रवेश मार्गाच्या परिसरात पाणी तुंबल्याने तात्पुरती उभारलेली भिंत कोसळली गेली आणि यातून साचलेले पाणी स्थानकात शिरले. या परिसरातील पर्जन्य जलवाहितील पाण्याचा प्रवाह योग्य प्रकारे न झाल्याने तसेच समुद्राला त्याच वेळी मोठी भरती असल्याने याठिकाणी पाणी साचले गेले आणि त्यामुळे भिंत कोसळून पाणी शिरले. परंतु ही स्थिती पहिल्याच पावसात घडल्याने भविष्यात काय होईल अशाप्रकारची भीती लोकांच्य मनात निर्माण झाली आहे.


मेट्रो रेल्वेची बहुतांशी रेल्वे स्थानके चौकांमध्ये तथा पर्जन्य जलवाहिन्या जिथे वक्राकार वळल्या जात आहेत,त्याठिकाणी आहे. त्यामुळे पर्जन्य जलवाहिनीतील पाण्याचा प्रवाह याच ठिकाणी संथ होवून जातो आणि अशातच समुद्राला मोठ्या स्वरुपाची भरती आणि पाऊस एकाच वेळी आल्यास भविष्यात अशी परिस्थिती येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे काही निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वे स्थानकांच्या परिसर हा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे, तेथील मागील २० ते २५ वर्षांत किती पावसाची नोंद झाली आहे, किती वेळा पाणी साचले आहे. तेथील पर्जन्य जलवाहिनीची स्थिती आदीची माहिती संकलित करून महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाचे अधिकारी आणि मेट्रोचे अधिकारी यांनी संयुक्तपणे पाहणी करून पुढील उपाययोजना आखल्यास योग्य ठरेल असे काही निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, मुंबई मेट्रोच्यावतीने रेल्वे स्थानकांच्या परिसरात पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपाची व्यवस्था केलेली आहे. परंतु, हे पंप अंतर्गत स्थानकाच्या परिसरात असतील तर मग बाहेरील बाजुस साचणाऱ्या पंपासाठी महापालिकेच्यावतीने अतिरिक्त पंप बसवले जाणार आहेत की मेट्रो स्वत: बसवणार याबाबतचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Comments
Add Comment

Sonali Kulkarni : सोनाली कुलकर्णी चक्क ५ तास अडकली ट्रॅफिकमध्ये; शेअर केला व्हिडीओ

मुंबई : मुंबईकरांसाठी वाहतूक कोंडीही ही नवी नाही, परंतु एक रस्त्यांच्या कामांमुळे झालेली वाहतूक कोंडी ही अधिक

मोठी बातमी: विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार, महत्त्वाचे कारण समोर

Maharashtra Vidhan Parishad Election : महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीचे वारे जोरदार रंगात असताना मोठी बातमी समोर आली आहे.

सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतून झिशान सिद्धिकी यांचा विधानपरिषद सदस्य पदाचा अर्ज दाखल

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे आहे. पक्षातून विधान परिषद कोण लढवणार याची यादी

Shivsena : शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 2 उमेदवार जाहीर; बच्चू कडूंसह नीलम गोऱ्हे अर्ज भरणार

Maharashtra Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे. विधान

Fraud Alert At Andheri Station : धक्कादायक! अंधेरी रेल्वे स्टेशनवर अज्ञात महिलेकडून फसवणुकीचा प्रकार

- खोटी कारणे सांगून अनेक प्रवाशांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न मुंबई : मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनचा एक व्हिडीओ

Mithi River : मिठी नदीत डेब्रीज टाकून वाढवले जाते गाळाचे वजन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील मिठी नदीच्या सफाईच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत याचे २७ टक्के काम