सर्व विभागांच्या समन्वयातून ‘आषाढी वारी’ यशस्वी करा

मुंबई : पंढरपुरची ‘आषाढी वारी’ पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. वारकरी आणि वारी राज्याचे वैभव वाढविणारी आहे. यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाले असून या पार्श्वभूमीवर सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांसाठी पाणी, आरोग्य सुविधा, फिरती शौचालये आणि पोलीस बंदोबस्तासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. ही वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


सह्याद्री अतिथीगृह येथे आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह वित्त, नियोजन, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मानाच्या १० दिंड्यांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.


पुणे शहराच्या ठिकाणी विविध स्वागत मंडप, लाऊड स्पीकरवर बंदी, प्रत्येक पालख्यांना जास्तीचा पोलीस बंदोबस्त, अरूंद रस्त्यांचे रूंदीकरण, वाखरी मॉडेल वारकरी तळ, पालखीसोबत साध्या ॲम्ब्युलन्ससोबत कार्डियाक ॲम्ब्युलन्स, दर्शन पासची संख्या, वॉटर प्रूफ टेंट, पाण्याचे टँकर, मुबलक औषध साठा, पालख्यांच्या पारंपरिक मार्गाचा विकास, फिरती शौचालये, याबाबत सूचना मांडण्यात आल्या.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, वारीचे योग्य नियोजन करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आयुक्तांनी पालख्यांच्या स्वागतासाठी वेगळी व्यवस्था करावी. रस्त्याच्या बाजूला मंडप टाकून स्वागत करावे, मात्र पालख्यांना विलंब होवू नये, याची दक्षता घ्यावी. वारीच्या यशस्वी नियोजनासाठी आपत्ती व्यवस्थापनाने दक्ष राहावे.


यावर्षीही राहणार समूह विमा


पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी १५ ते २० लाख वारकरी सहभागी होतात. पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात किंवा मृत्यू झाल्यास या संदर्भात संबंधितांना दिलासा देण्यासाठी शासनाने मागील वर्षी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ सुरु करण्याचा निर्णय घेतला. यावर्षीही वारीमध्ये सामील होणाऱ्या वारकऱ्यांना समूह विमा राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मानाच्या पालखीमधील वारकऱ्यांना यापुढे दर्शन पास योग्य प्रमाणात वाढवून दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

New Navi Mumbai-Sindhudurg flight service : नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपूर्वी सुरू होणार; मंत्री नितेश राणे यांनी घेतली बैठक; 'फ्लाय-९१' विमान कंपनी देणार सेवा

MUMBAI : नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानची बहुप्रतीक्षित विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी म्हणजेच १५ ऑगस्टपूर्वी

UP Religious Conversion : ५ वर्षांपासून सुरू असलेला 'लव्ह ट्रॅप'! जिम ट्रेनर तरुणीच्या प्रेमात बिझनेसमनचा मुलगा अडकला; नाव-धर्म दोन्ही बदलले

Satara Suicide : WhatsApp स्टेटसमुळे वाचले महिला पोलिसाचे प्राण; नेमकं काय घडलं?

Rajendra Jain : मंत्री भुजबळांचे आशीर्वाद घेत राजेंद्र जैन यांच्याकडून राज्यसभेसाठी अर्ज दाखल

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार  (Sunetra Pawar) यांनी विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राज्यसभेच्या

KIDNAPPING : विवाहित महिलेशी संभाषणाच्या संशयातून तरुणाचे अपहरण; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केली सुटका

BARAMATI: बारामती तालुक्यातील सुपा परिसरातून एका तरुणाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली.

Suryakumar Yadav : टीम इंडियानंतर आता मुंबई इंडियन्सची साथही सोडणार? सूर्यकुमार यादवच्या भविष्याबाबत चर्चांना उधाण

MUMBAI: भारतीय क्रिकेट संघाच्या टी-20 कर्णधारपदावरून हटवल्यानंतर आणि आगामी आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय