पालीत नागरिकांचे आरोग्य संकटात

खोपोली महामार्गावर रासायनिक कचऱ्याचा खच


सुधागड-पाली : पाली-खोपोली महामार्गावरील दापोडे गावाजवळ मोठ्या प्रमाणावर रासायनिक कचरा टाकण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एस्सार पेट्रोल पंपाच्या शेजारी हा कचरा खुलेआम फेकण्यात आला असून मुसळधार पावसामुळे तो पाण्यात मिसळत थेट आंबा नदीत पोहोचत आहे. हीच नदी पाली शहरातील हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.


आरोग्याला धोका; नागरिकांची चिंता
स्थानिक ग्रामस्थांनी या घटनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून दूषित पाणी पिल्याने त्वचेचे विकार, पचनतंत्राच्या समस्या, गंभीर आजार आणि कॅन्सर यांचा धोका निर्माण झाला आहे. तसेच, परिसरातील शेती, जंगलातील वन्यजीव आणि पशुपक्ष्यांवरही या प्रदूषणाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.


प्रशासनाची उदासीनता ही कोणाची जबाबदारी?
प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिली नसल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे. सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता त्यांनी प्रदूषण महामंडळ आणि पोलीस प्रशासनाला तपासणीसाठी पत्र पाठवल्याचे सांगितले, मात्र आत्तापर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. रासायनिक कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण गंभीर संकटात सापडले आहे. प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करून संबंधित दोषींवर कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच, रासायनिक कचरा नियंत्रित करण्यासाठी आणि पाणी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्यास प्रशासनाने संपूर्णतः जबाबदार राहिले पाहिजे. स्थानिकांनी या प्रश्नावर जागरूकता वाढवून आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली पाहिजे.

Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित