अबब! गडकरींच्या पत्नीच्या शेतात भले मोठे कांदे!

नागपूर : नागपूरच्या धापेवाडा परिसरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 'भक्ती फार्म'वर सेंद्रिय शेतीचा एक आश्चर्यजनक आणि प्रेरणादायी प्रयोग घडून आला आहे. गडकरींच्या पत्नी कांचन गडकरी यांनी येथे सेंद्रिय कांद्याचं यशस्वी उत्पादन घेतलं असून या कांद्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वजन प्रत्येकी जवळपास ८०० ग्रॅम ते तब्बल १ किलो आहे.


या अनोख्या प्रयोगाबाबत माहिती देताना नितीन गडकरी यांनी स्वतः एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात त्यांनी कांद्याचे बियाणे कुठून आणले, कोणती शेती तंत्रज्ञान वापरली, आणि सेंद्रिय पद्धतीने उत्पादन कसं घेतलं याची सविस्तर माहिती दिली आहे.


या प्रयोगासाठी वापरण्यात आलेली कांद्याची बियाणं नेदरलँड्समधून आयात करण्यात आली होती. Seminis या कंपनीच्या बियांची २.५ किलोची बॅच एका एकर शेतात पेरण्यात आली. सुरुवातीला ४५ दिवसांची नर्सरी तयार करण्यात आली, त्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर करण्यात आला आणि बायो-सेंद्रिय खतांनी जमीन समृद्ध करण्यात आली. पाणीपुरवठा अत्याधुनिक डबल ड्रिप इरिगेशन पद्धतीने करण्यात आला.



नर्सरीतून उगवलेल्या रोपांची लागवड त्यानंतर दुसऱ्या भागात करण्यात आली. एकूण २४,००० कांद्याच्या रोपांची लागवड करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान फक्त ७ ते १० टक्के रोपे नष्ट झाली, जे मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी तुलनेने खूपच कमी नुकसान मानलं जातं. शेवटी उत्पादन घेतल्यावर प्रत्येकी कांद्याचं वजन ४०० ग्रॅमपासून ते ८००-१००० ग्रॅमपर्यंत नोंदवलं गेलं.


गडकरी यांनी म्हटलं की, “या प्रक्रियेदरम्यान सर्व प्रकारची काळजी घेतली गेली. कोणीही सेंद्रिय शेती करू इच्छित असेल, तर आम्ही त्यांना पूर्ण मदत करण्यास तयार आहोत.” त्यांनी पुढे सांगितलं की या एक एकर जमीनीतून १२ ते १३ टन सेंद्रिय कांद्याचं उत्पादन मिळालं आहे.


हा सेंद्रिय शेतीचा प्रयोग आता शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि प्रेरणा निर्माण करत आहे. रासायनिक खतांवर अवलंबून राहण्याऐवजी पर्यायी नैसर्गिक पद्धतीने अधिक आणि दर्जेदार उत्पादन घेता येऊ शकतं, हे गडकरींच्या शेतातून पुन्हा सिद्ध झालं आहे.

Comments
Add Comment

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "

Chandrashekhar Bawankule : नार्को टेस्ट करण्यास मी तयार!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मनोज जरांगेंच्या आरोपांवर दिले सडेतोड उत्तर मुंबई :

Ashok Kharat Case : हाताला लकवा तरी..., भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड

Ashok Kharat Case : समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याने पैशांचा भरणा