अबब! गडकरींच्या पत्नीच्या शेतात भले मोठे कांदे!

नागपूर : नागपूरच्या धापेवाडा परिसरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 'भक्ती फार्म'वर सेंद्रिय शेतीचा एक आश्चर्यजनक आणि प्रेरणादायी प्रयोग घडून आला आहे. गडकरींच्या पत्नी कांचन गडकरी यांनी येथे सेंद्रिय कांद्याचं यशस्वी उत्पादन घेतलं असून या कांद्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वजन प्रत्येकी जवळपास ८०० ग्रॅम ते तब्बल १ किलो आहे.


या अनोख्या प्रयोगाबाबत माहिती देताना नितीन गडकरी यांनी स्वतः एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात त्यांनी कांद्याचे बियाणे कुठून आणले, कोणती शेती तंत्रज्ञान वापरली, आणि सेंद्रिय पद्धतीने उत्पादन कसं घेतलं याची सविस्तर माहिती दिली आहे.


या प्रयोगासाठी वापरण्यात आलेली कांद्याची बियाणं नेदरलँड्समधून आयात करण्यात आली होती. Seminis या कंपनीच्या बियांची २.५ किलोची बॅच एका एकर शेतात पेरण्यात आली. सुरुवातीला ४५ दिवसांची नर्सरी तयार करण्यात आली, त्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर करण्यात आला आणि बायो-सेंद्रिय खतांनी जमीन समृद्ध करण्यात आली. पाणीपुरवठा अत्याधुनिक डबल ड्रिप इरिगेशन पद्धतीने करण्यात आला.



नर्सरीतून उगवलेल्या रोपांची लागवड त्यानंतर दुसऱ्या भागात करण्यात आली. एकूण २४,००० कांद्याच्या रोपांची लागवड करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान फक्त ७ ते १० टक्के रोपे नष्ट झाली, जे मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी तुलनेने खूपच कमी नुकसान मानलं जातं. शेवटी उत्पादन घेतल्यावर प्रत्येकी कांद्याचं वजन ४०० ग्रॅमपासून ते ८००-१००० ग्रॅमपर्यंत नोंदवलं गेलं.


गडकरी यांनी म्हटलं की, “या प्रक्रियेदरम्यान सर्व प्रकारची काळजी घेतली गेली. कोणीही सेंद्रिय शेती करू इच्छित असेल, तर आम्ही त्यांना पूर्ण मदत करण्यास तयार आहोत.” त्यांनी पुढे सांगितलं की या एक एकर जमीनीतून १२ ते १३ टन सेंद्रिय कांद्याचं उत्पादन मिळालं आहे.


हा सेंद्रिय शेतीचा प्रयोग आता शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि प्रेरणा निर्माण करत आहे. रासायनिक खतांवर अवलंबून राहण्याऐवजी पर्यायी नैसर्गिक पद्धतीने अधिक आणि दर्जेदार उत्पादन घेता येऊ शकतं, हे गडकरींच्या शेतातून पुन्हा सिद्ध झालं आहे.

Comments
Add Comment

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली