ठाण्यातून पाकिस्तानच्या गुप्तहेराला अटक

ठाणे : मुंबई जवळच्या ठाण्यातून पाकिस्तानच्या एका गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. भारतातली संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप अटक केलेल्या हेरावर आहे. या गुप्तहेराला महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे.

आरोपी मुंबईतील एका महत्त्वाच्या संस्थेसाठी काम करत होता आणि एका पाकिस्तानी एजंटने त्याला 'हनीट्रॅप'मध्ये अडकवले होते. पाकिस्तानी एजंटने फेसबुकवर महिला असल्याचे भासवून आरोपीशी मैत्री केली होती. आरोपीने नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत व्हॉट्सअॅपद्वारे एका 'पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणे'ला एका महत्त्वाच्या आस्थापनेबद्दलची संवेदनशील माहिती शेअर केली होती.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीआधारे एटीएसच्या ठाणे शाखेने आरोपीला इतर दोघांसह ताब्यात घेतले. सुरुवातीच्या चौकशीनंतर, त्या व्यक्तीला अधिकृत गुपित कायद्याच्या कलम ३ (जे हेरगिरीशी संबंधित आहे) आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ६१ (२) (गुन्हेगारी कट) अंतर्गत अटक करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या इतर दोघांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Comments
Add Comment

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा खुलासा; 'प्लॅन A' फसला, मग रचला हत्येचा कट

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या (Murder) प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पुण्याजवळील लोहगड (Lohgad

Iran-US War :ट्रम्प प्रशासनासमोर आर्थिक आव्हान; इराणसह युद्धासाठी नव्या निधीची गरज

Iran-US War : इराण-अमेरिका युद्ध (Iran-US War) पुन्हा तीव्र होत असताना अमेरिकेच्या संरक्षण खर्चात (Defense Spending) मोठी वाढ झाली आहे.

Mumbai Rain : मुंबईकरांनो सावधान! आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

मुंबई : मुंबई (Mumbai) शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून बुधवारी (२३ जुलै) पावसाची

Maharashtra CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार... मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी लिहिलेलं पत्र

Good Hair : केस गळतायत? मग आहारात नक्की समाविष्ट करा 'हे' ८ पदार्थ; केस होतील मजबूत आणि दाट

मुंबई : बदलती जीवनशैली, ताणतणाव, प्रदूषण आणि अयोग्य आहार यामुळे केस गळणे, केस पातळ होणे आणि अकाली पांढरे होणे या

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित