यंदाच्या वर्षातले दुसरे सूर्यग्रहण कधी होणार ? भारतातून दिसणार ?

नवी दिल्ली : जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. यंदाच्या वर्षात म्हणजेच २०२५ मध्ये ही स्थिती अर्थात सूर्यग्रहण २१ सप्टेंबर रोजी आहे. ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ग्रहणांबाबत अनेकांना उत्सुकता असते. याआधी २९ मार्च रोजी सूर्यग्रहण झाले होते. ते आंशिक सूर्यग्रहण होते. हे ग्रहण भारतातून दिसले नव्हते. आता २१ सप्टेंबर रोजी दिसणार असलेले सूर्यग्रहणही आंशिक आहे आणि भारतातून दिसणार नाही.


केव्हा आहे वर्षातील दुसरे सूर्यग्रहण ?


यंदाच्या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री उशिरा ०३ वाजून २३ मिनिटांनी (२२ सप्टेंबर २०२५) संपेल. हे एक आंशिक सूर्यग्रहण असेल, जे अश्विन अमावस्येला होणार आहे.


सूर्यग्रहण कुठे दिसणार ?


हे सूर्यग्रहण प्रामुख्याने न्यूझीलंड, फिजी, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलियाच्या अनेक भागांमध्ये दिसणार आहे. मात्र, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतात याचे धार्मिक किंवा ज्योतिषीय परिणाम विचारात घेतले जाणार नाहीत आणि सुतक काळही लागू होणार नाही.


२०२५ मधील पहिले सूर्यग्रहण कधी झाले ?


यापूर्वी २०२५ मधील पहिले सूर्यग्रहण २९ मार्च रोजी झाले होते. ते देखील आंशिक सूर्यग्रहण होते आणि ते भारतात दिसले नव्हते.


सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे, जिथे चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, ज्यामुळे सूर्याचा प्रकाश काही प्रमाणात किंवा पूर्णपणे पृथ्वीवर पोहोचू शकत नाही. धार्मिक आणि ज्योतिषीयदृष्ट्या ग्रहणाचे विशेष महत्त्व मानले जाते, परंतु ते दिसणाऱ्या प्रदेशांसाठीच लागू होते. जे ग्रहण काळतात सूतक पाळतात अशा भारतीयांनी यंदाच्या सूर्यग्रहणावेळी सूक पाळण्याची आवश्यकता नाही. कारण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.

Comments
Add Comment

Hapur News : लग्न समारंभात राडा! हापूरमध्ये माशांच्या स्टॉलवर पाहुण्यांनी टाकला 'दरोडा, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

हापूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात आनंदाच्या वातावरणाऐवजी धक्कादायक आणि

Virat Ramayana Temple : जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची आज स्थापना! २१० टन वजन, ३३ फूट उंची; बिहारमधील 'विराट रामायण मंदिर' ठरणार आकर्षणाचे केंद्र

मोतिहारी : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे आज एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळणार आहे. येथील विराट

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.